शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

अव्वल कारकुनाच्या आत्महत्येच्या धमकीने प्रशासनाची उडाली भितीने गाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:01 IST

जिल्हा महसूल प्रशासनाने जून महिन्यात अव्वल कारकून, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील केलेल्या बदल्यांमुळे अनेक कर्मचारी अस्वस्थ असून, त्याचा भडका बुधवारी उडाला.

ठळक मुद्दे आयुक्तांना दिले लेखी पत्र : आत्महत्या करणार असल्याचे पत्र सोशल मीडियातून व्हायरल केल्याने सगळ्यांचीच धावपळ

औरंगाबाद : जिल्हा महसूल प्रशासनाने जून महिन्यात अव्वल कारकून, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील केलेल्या बदल्यांमुळे अनेक कर्मचारी अस्वस्थ असून, त्याचा भडका बुधवारी उडाला. अव्वल कारकून राजेंद्र बागडे यांनी आत्महत्या करीत असल्याचे धमकीपत्र सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाची भीतीने गाळण उडाली.जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोयगाव येथे केलेल्या बदलीला स्थगिती मिळावी, यासाठी बागडे यांनी मॅट, कोर्टातून स्थगिती मिळविल्यानंतरही त्यांची बदली रद्द झाली नाही. न्यायालयीन आदेशांना प्रशासन जुमानत नसल्याच्या वैतागातून त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना आत्महत्या करीत असल्याचे हस्तलिखित पत्र दिले. ते पत्र त्यांनी जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह महसूल प्रशासनाच्या सोशल मीडिया गु्रपमध्येही व्हायरल केले. पत्रात बागडे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. दरम्यान, प्रशासनासह कर्मचारी संघटना व नातेवाईकांनी त्यांचा दिवसभर शोध सुरू केला, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सिटीचौक पोलिसांनादेखील याप्रकरणी सूचना दिल्या. सायंकाळपर्यंत बागडे यांचा फोन न लागल्यामुळे मोबाईल ट्रॅकरद्वारे ते औरंगाबाद लेणी परिसरात असल्याचे लक्षात आले. महसूल अधिकारी, पोलिसांनी त्यांना तेथे समजावले. दरम्यान, त्यांना आकाशवाणी परिसरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर आदींनी बागडे यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बागडे यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, आस्थापना अधिकारी, महसूल प्रशासनावर गंभीर आरोप केले. जिल्हाधिकाºयांसह प्रशासनातील कुणीही दाद देत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. याप्रकरणी जिल्हाधिकाºयांशी संपर्क होऊ शकला नाही.एकूण कर्मचाºयांच्या तीस टक्के बदल्या करता येतात. ६५ मंडळ अधिकाºयांपैकी ३८ जणांच्या बदल्या केल्या. तेथे १८ जण बदलीसाठी पात्र होते. बदल्यांमुळे शासन आदेशाची पायमल्ली झाली आहे. ज्यांचे एक वर्ष सेवेचे उरलेले आहे. त्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. ३६ कर्मचाºयांचे मुख्यालय बदलण्यात आल्याचे मत संघटनेने व्यक्त केले. दरम्यान, महसूल कर्मचारी संघटनेचे सतीश तुपे, अनिल सूर्यवंशी यांनी या प्रकरणात जिल्हाधिकाºयांची भेट घेतली....तर बागडेंवर कारवाई होऊ शकतेआॅनलाईन फेरफार प्रलंबित ठेवल्याच्या तक्रारीसंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चौकशी करून बागडेंना निलंबित केले होते. त्यावेळी बागडे यांनी जिल्हाधिकाºयांच्या निलंबन आदेशाला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडून स्थगिती मिळविली. राम यांनी बागडेंच्या तक्रारीसंदर्भात सविस्तर अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवून निलंबन कारवाई योग्यच असल्याचे म्हटले होते. डॉ. भापकर यांच्याकडे त्यावर सुनावण्या झाल्या. मात्र, अंतिम आदेश दिले नाहीत. आयुक्तांनी निर्णय दिला, तर प्रशासनाला वेठीस धरणे, शिस्तभंग केल्यावरून बागडे यांच्यावर कारवाई होऊ शकते. यासाठी जिल्हा प्रशासन गुरुवारी आयुक्तांना बोलणार आहे.पोलिसांत बागडेविरोधात तक्रारजिल्हा प्रशासनाने अव्वल कारकून बागडे यांच्या विरोधात सिटीचौक पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी सांगितले, याप्रकरणी जिल्हाधिकाºयांमार्फत तक्रार प्राप्त झाली आहे. अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून, चौकशी अंती निर्णय होईल.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय