शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येमुळे १४ जणांचे कुटुंब उघडयावर

By admin | Updated: December 11, 2014 00:44 IST

एक मुलगा आजाराने तर दुसऱ्याने नापिक जमिनीमुळे व कर्जबाजारीपणामुळे नैराश्य आल्याने आत्महत्या केली.

अंबाजोगाई : एक मुलगा आजाराने तर दुसऱ्याने नापिक जमिनीमुळे व कर्जबाजारीपणामुळे नैराश्य आल्याने आत्महत्या केली. कुटुंबातील कर्त्या पुरुषानेच जीवनयात्रा संपविल्याने चौदा जणांचे कुटुंब उघडयावर आले. अंथरूणावर खिळलेल्या ऐंशी वर्षीय वृद्ध पित्यासमोर कुटुंब चालविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अशा भीषण स्थितीत सामना करायचा तरी कसा? ही मोठी समस्या बर्दापूर येथील सूर्यवंशी कुटुंबासमोर उभी राहिली आहे. तालुक्यातील बर्दापूर येथील ज्ञानेश्वर मोहनराव सूर्यवंशी (वय - ३८) या शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्याने शेतातील विद्युत तारेला हातात घेऊन आत्महत्या केली. बर्दापूर येथील मोहनराव सूर्यवंशी (वय - ८०) हे वृद्धापकाळाने व हत्तीपायाच्या आजाराने त्रस्त असल्याने अंथरूणावर खिळून आहेत. त्यांना दोन मुले होती. दोन वर्षांपूर्वी एका मुलाचे आजाराने निधन झाले. तर दुसरा ज्ञानेश्वर याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. मोहनराव यांच्या मालकीची १६ एकर शेतजमीन आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने उत्पादन घटले. तसेच गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीमुळेही मोठे संकट समोर आले. गारपिटीचा सामना करतांना अत्यल्प पावसाने पिके गेली. उत्पादन घटले. शेतात लावलेल्या ऊसालाही पाणी द्यायचे तर विहिरीनेही तळ गाठला. अशा भीषण स्थितीत कुटुंब कसे चालवावे, असा मोठा पेच ज्ञानेश्वर यांच्यासमोर उभा राहिला. ज्ञानेश्वर यांच्या कुटुंबात आई-वडील, मोठी भावजय तिची मुले, स्वत:च्या पाच मुली व एक मुलगा असा चौदा जणांचा परिवार आहे.त्यात वडीलांच्या आजारामुळे मोठा खर्च होऊ लागला. आर्थिक स्थिती खालावली व खर्च वाढू लागला. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचे आकडेही फुगू लागले. अशा भीषण स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा? हा मोठा प्रश्न ज्ञानेश्वर यास भेडसावू लागला. या स्थितीतून नैराश्य आल्याने २८ नोव्हेंबर रोजी तो शेतात गेला. शेतात विद्युत प्रवाह सुरू असलेले केबल हातात धरून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. दोन्ही मुलांच्या निधनाचे दु:ख अंथरूणावर खिळलेल्या मोहनराव यांच्यासमोर उभे राहिले. हा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह आता कोण चालविणार? हा प्रश्न वृद्धापकाळातही त्यांना भेडसावू लागला आहे. दोन दिवस सहानुभुती दर्शविली जाते. पुन्हा काय? अंथरूणावर खिळलेल्या स्थितीत कुटुंब चालविण्याचे मोठे आवाहन त्यांच्यासमोर उभे आहे. सव्वा लाखांची मदतआ. धनंजय मुंडे यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पाच मुलींच्या नावावर प्रत्येकी २५ हजार रुपये या प्रमाणे सव्वा लाख रुपयांची मदत त्यांनी शिक्षणासाठी मुलींना केली आहे. जोडवाडी येथील गोविंद प्रल्हाद इंगळे (वय - ३८) या शेतकऱ्याने धसवाडी शिवारातील शेतातील सोयाबीनचे पीक हातचे गेले. मुलीचे जमलेले लग्न कसे करायचे? याच्या धास्तीने २५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता शेतातच विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.कर्जबाजारीपणामुळे नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने मदत दिली जाते. मात्र, ही मदत देतांना त्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना कागदपत्रांची पुर्तता करतांना नाकीनऊ येतात. ४कृषि अधिकारी, महसूल, पोलिस ठाणे, रुग्णालय यांचे अहवाल एकत्रित करून ते सादर करायचे. मग तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविला जातो.४ पाठविलेल्या प्रस्तावाचीही शहानिशा करण्याची लालफितीची यंत्रणा शेतकऱ्यांमध्ये पुन्हा नैराश्य आणते. परिणामी शासकीय मदत विंवचनाच ठरते, असे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अजय बुरांडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले़