शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मयत ‘सुरश्या’ साखळीचोर

By admin | Updated: July 6, 2017 23:24 IST

बीड /गेवराई : गेवराई तालुक्यातील सिरसदेवीजवळ बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात ठार झालेला सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड /गेवराई : गेवराई तालुक्यातील सिरसदेवीजवळ बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात ठार झालेला सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. शेगाव येथे पोलिसांनी पकडलेल्या साखळी चोरांच्या टोळीत तो म्होरक्या होता. रोहितळमध्ये चोरी केल्यानंतर लोक मागे लागल्याच्या भीतीने ते सुसाट जात होते. याचवेळी त्यांची दुचाकी हातपंपाला धडकून अपघात झाला होता. पोलिसांच्याच गाडीने अपघात केल्याचा आरोप करून नातेवाईकांनी तब्बल २१ तास मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. या अपघाताला कलाटणी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.सुरेश रामड्या चव्हाण (२५, रा.परतूर जि.जालना), आकाश लक्ष्मण शिंदे (२०, गेवराई) व ज्ञानेश्वर पिसे (१७, अंतरवाली) हे तिघे मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून गेवराईहून परतूरला जात असताना अपघात झाला होता. यामध्ये सुरेश उर्फ सुरश्या हा ठार तर आकाश व ज्ञानेश्वर हे दोघे जखमी झाले होते. हे तिघेही मित्र होते. सुरेश चव्हाण हा मागील काही वर्षांपासून सासुरवाडीतच (आंतरवली ता. गेवराई) वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, ज्ञानेश्वर हा मंंगळवारी दुपारी दोन वाजता तलवाडा येथे गेला होता. तेथे त्याला आकाश व सुरेश भेटले. सुरेशने या दोघांनाही पाथरी येथील मित्राला भेटायला जायचे आहे, असे सांगून दुचाकीवर बसविले. त्याप्रमाणे ते मित्राला भेटले. तेथून रात्री ९ च्या सुमारास ते परतही निघाले. रात्री १ वाजण्याच्या सुमारास ते गेवराई तालुक्यातील रोहितळजवळ आले. येथे एका शेतकऱ्याला दमदाटी करून हातातील मोबाईल हिसकावत पळ काढला. शेतकऱ्याने आरडाओरडा केला. ग्रामस्थ जमा होण्यापूर्वीच या तिघांनी दुचाकीवरून पळ काढला. जवळ कोणी आले का, हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिले असता त्यांची दुचाकी हातपंपाला धडकली. यावेळी ज्ञानेश्वरने सुरेशला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु फायदा झाला नाही. आकाशला उठविले तर तो पायाला लागले आहे असे म्हणून आडवा पडला. ज्ञानेश्वर थोडा शुद्धीत असल्यामुळे तो पायी चालत जवळच असलेल्या जातेगाव येथे गेला. येथे त्याचा मित्र अमोल कारके याला झोपेतून उठवून घडला प्रकार सांगितला. अमोलच्या दुचाकीवरून ते घटनास्थळी आले. यावेळी तेथे कोणीच नव्हते. ज्ञानेश्वरने सुरेशचा अपघात झाल्याची माहिती त्याच्या सासऱ्याला दिली. त्यानंतर अमोल व ज्ञानेश्वर दुचाकीवरून गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पोहचले. ते येण्यापूर्वीच सुरेशचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते. सुरेशच्या दुचाकीवर ज्ञानेश्वरच होता, असे म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर आकाश व ज्ञानेश्वरला प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ज्ञानेश्वरने तसा जबाब वैद्यकीय अधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर दिला आहे.