शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

मयत ‘सुरश्या’ साखळीचोर

By admin | Updated: July 6, 2017 23:24 IST

बीड /गेवराई : गेवराई तालुक्यातील सिरसदेवीजवळ बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात ठार झालेला सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड /गेवराई : गेवराई तालुक्यातील सिरसदेवीजवळ बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात ठार झालेला सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. शेगाव येथे पोलिसांनी पकडलेल्या साखळी चोरांच्या टोळीत तो म्होरक्या होता. रोहितळमध्ये चोरी केल्यानंतर लोक मागे लागल्याच्या भीतीने ते सुसाट जात होते. याचवेळी त्यांची दुचाकी हातपंपाला धडकून अपघात झाला होता. पोलिसांच्याच गाडीने अपघात केल्याचा आरोप करून नातेवाईकांनी तब्बल २१ तास मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. या अपघाताला कलाटणी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.सुरेश रामड्या चव्हाण (२५, रा.परतूर जि.जालना), आकाश लक्ष्मण शिंदे (२०, गेवराई) व ज्ञानेश्वर पिसे (१७, अंतरवाली) हे तिघे मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून गेवराईहून परतूरला जात असताना अपघात झाला होता. यामध्ये सुरेश उर्फ सुरश्या हा ठार तर आकाश व ज्ञानेश्वर हे दोघे जखमी झाले होते. हे तिघेही मित्र होते. सुरेश चव्हाण हा मागील काही वर्षांपासून सासुरवाडीतच (आंतरवली ता. गेवराई) वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, ज्ञानेश्वर हा मंंगळवारी दुपारी दोन वाजता तलवाडा येथे गेला होता. तेथे त्याला आकाश व सुरेश भेटले. सुरेशने या दोघांनाही पाथरी येथील मित्राला भेटायला जायचे आहे, असे सांगून दुचाकीवर बसविले. त्याप्रमाणे ते मित्राला भेटले. तेथून रात्री ९ च्या सुमारास ते परतही निघाले. रात्री १ वाजण्याच्या सुमारास ते गेवराई तालुक्यातील रोहितळजवळ आले. येथे एका शेतकऱ्याला दमदाटी करून हातातील मोबाईल हिसकावत पळ काढला. शेतकऱ्याने आरडाओरडा केला. ग्रामस्थ जमा होण्यापूर्वीच या तिघांनी दुचाकीवरून पळ काढला. जवळ कोणी आले का, हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिले असता त्यांची दुचाकी हातपंपाला धडकली. यावेळी ज्ञानेश्वरने सुरेशला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु फायदा झाला नाही. आकाशला उठविले तर तो पायाला लागले आहे असे म्हणून आडवा पडला. ज्ञानेश्वर थोडा शुद्धीत असल्यामुळे तो पायी चालत जवळच असलेल्या जातेगाव येथे गेला. येथे त्याचा मित्र अमोल कारके याला झोपेतून उठवून घडला प्रकार सांगितला. अमोलच्या दुचाकीवरून ते घटनास्थळी आले. यावेळी तेथे कोणीच नव्हते. ज्ञानेश्वरने सुरेशचा अपघात झाल्याची माहिती त्याच्या सासऱ्याला दिली. त्यानंतर अमोल व ज्ञानेश्वर दुचाकीवरून गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पोहचले. ते येण्यापूर्वीच सुरेशचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते. सुरेशच्या दुचाकीवर ज्ञानेश्वरच होता, असे म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर आकाश व ज्ञानेश्वरला प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ज्ञानेश्वरने तसा जबाब वैद्यकीय अधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर दिला आहे.