शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

चारा टंचाईमुळे शेतकरी दुहेरी संकटात

By admin | Updated: April 22, 2015 00:40 IST

बीड: यंदा रबी हंगामातील घटत्या उत्पनाचा परिणाम पिकांबरोबर चाऱ्यावरही झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असतानाच

बीड: यंदा रबी हंगामातील घटत्या उत्पनाचा परिणाम पिकांबरोबर चाऱ्यावरही झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असतानाच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मध्यंतरीच्या अवकाळीचा फायदा उचलत चारा पिकाच्या लागवाडीमध्ये सरासरीपेक्षा वाढ झाली आहे.पाण्याअभावी रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकाची पूर्ण वाढच झाली नाही. नाईलजास्तव ज्वारी बाटूक स्थितीमध्येच असताना काढणी झाली. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सध्या चाऱ्यावर झाला असल्याचे दिसत आहे. जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उन्हाळी हंगामात मका, घास, गवत आदींची लागवड केली जात होती. मात्र गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती ओढावल्याने चारा लागवडीमध्ये घटच होत आहे. त्यामुळे हिरव्या चाऱ्याला पशुधन मुकले आहे. सध्या जिल्ह्यात तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. ज्वारीची काढणी झाल्याबरोबरच चाऱ्याची चुणचुण भासू लागली आहे. उन्हापासून बचाव होण्याकरीता जनावरे दावणीला बांधली जातात मात्र त्यांना जगविण्यासाठी काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे जनावरांच्या चाऱ्याचे दर वाढत आहे तर दुसरीकडे दुग्धव्यवसायातून फायदा तर सोडाच मात्र होणारा खर्चही निघत नाही. कडब्याबरोबर पेंड, कळना, मक्याचा भरडा या चाऱ्यांचेही दर गगणाला भिडले आहेत. चाऱ्यासाठी अवकाळीचा आधारगेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या पिकांवर पाणी फेरणारा अवकाळीचा उन्हाळ्यात मात्र चारा पेरणीकरिता शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे. जमिनीत पुरता ओलावा असल्याने उन्हाळी हंगामात चारापिकांच्या लागवडीत दुप्पटीने वाढ झाली आहे. यामध्ये मक्याचे अधिक प्रमाण आहे. मक्याचे ६४० हेक्टर क्षेत्र असूनही सुमारे १२६३ हेक्टरमध्ये मक्याचा पेरा झाला आहे. तर कडवळ, घास, गवत, आदी चाऱ्यांचे २ हजार हेक्टरवर लागवड केली आहे. (प्रतिनिधी)