शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चारा टंचाईमुळे शेतकरी दुहेरी संकटात

By admin | Updated: April 22, 2015 00:40 IST

बीड: यंदा रबी हंगामातील घटत्या उत्पनाचा परिणाम पिकांबरोबर चाऱ्यावरही झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असतानाच

बीड: यंदा रबी हंगामातील घटत्या उत्पनाचा परिणाम पिकांबरोबर चाऱ्यावरही झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असतानाच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मध्यंतरीच्या अवकाळीचा फायदा उचलत चारा पिकाच्या लागवाडीमध्ये सरासरीपेक्षा वाढ झाली आहे.पाण्याअभावी रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकाची पूर्ण वाढच झाली नाही. नाईलजास्तव ज्वारी बाटूक स्थितीमध्येच असताना काढणी झाली. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सध्या चाऱ्यावर झाला असल्याचे दिसत आहे. जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उन्हाळी हंगामात मका, घास, गवत आदींची लागवड केली जात होती. मात्र गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती ओढावल्याने चारा लागवडीमध्ये घटच होत आहे. त्यामुळे हिरव्या चाऱ्याला पशुधन मुकले आहे. सध्या जिल्ह्यात तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. ज्वारीची काढणी झाल्याबरोबरच चाऱ्याची चुणचुण भासू लागली आहे. उन्हापासून बचाव होण्याकरीता जनावरे दावणीला बांधली जातात मात्र त्यांना जगविण्यासाठी काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे जनावरांच्या चाऱ्याचे दर वाढत आहे तर दुसरीकडे दुग्धव्यवसायातून फायदा तर सोडाच मात्र होणारा खर्चही निघत नाही. कडब्याबरोबर पेंड, कळना, मक्याचा भरडा या चाऱ्यांचेही दर गगणाला भिडले आहेत. चाऱ्यासाठी अवकाळीचा आधारगेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या पिकांवर पाणी फेरणारा अवकाळीचा उन्हाळ्यात मात्र चारा पेरणीकरिता शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे. जमिनीत पुरता ओलावा असल्याने उन्हाळी हंगामात चारापिकांच्या लागवडीत दुप्पटीने वाढ झाली आहे. यामध्ये मक्याचे अधिक प्रमाण आहे. मक्याचे ६४० हेक्टर क्षेत्र असूनही सुमारे १२६३ हेक्टरमध्ये मक्याचा पेरा झाला आहे. तर कडवळ, घास, गवत, आदी चाऱ्यांचे २ हजार हेक्टरवर लागवड केली आहे. (प्रतिनिधी)