शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कळंब-परंड्यावर टंचाईचे सावट

By admin | Updated: August 7, 2014 02:05 IST

उस्मानाबाद : जून-जुलै महिना कोरडा गेल्यानंतर आॅगस्टमध्येही वरुणराजाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे.

उस्मानाबाद : जून-जुलै महिना कोरडा गेल्यानंतर आॅगस्टमध्येही वरुणराजाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे. विशेषत: कळंब-परंडा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने येत्या १५ आॅगस्टपर्यंत दमदार पाऊस न झाल्यास या दोन्ही शहरांना टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत. या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. जिल्ह्याची पावसाची सरासरी ६६७.५ टक्के इतकी आहे. मात्र जुन-जुलै महिन्यामध्ये अवघा १५२.९ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊसही जिल्ह्याच्या ठराविक भागात झालेला असल्याने कळंब-परंड्यासह अनेक भागात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरी विभागातील पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. मात्र कळंब आणि परंडा नगर पालिका क्षेत्रात येत्या १५ आॅगस्टपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास येथे पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.कळंबसाठी चोराखळी तर परंडा शहरासाठी सीना-कोळेगाव प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येकी २० टँकरची आवश्यकता भासणार असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २११ प्रकल्पात केवळ ४ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यात दोन तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, एका नळयोजनेची विशेष दुरुस्तीही करण्यात येणार आहे. या बरोबरच टंचाईग्रस्त भागात ४१ नवीन विंधन विहिरी घेण्याचे नियोजन असून, यातील ३४ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय ४२८ विहीरी तसेच विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, ७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.(प्रतिनिधी)तीन लाखावर शेतकऱ्यांना मदतफेब्रुवारी, मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यात ३ लाख २८ हजार २१० शेतकरी बाधित झाले होते. तसेच जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार ३३४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांसाठी १९१.८४ लाख एवढा निधी मिळाला असून, त्यापैकी १९८ कोटी ६४ लाखाच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असून, या माध्यमातून ३ लाख २१ हजार ९० शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ७ हजार १२० शेतकऱ्यांना निधीचे वाटप करण्यात येत असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.