शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

टंचाईमुळे बाजारात गुरांची बेभाव विक्री

By admin | Updated: July 22, 2014 00:14 IST

कडा : आष्टी तालुक्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा,पाणी प्रश्न गंभीर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्रीस काढले आहे.

कडा : आष्टी तालुक्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा,पाणी प्रश्न गंभीर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्रीस काढले आहे. शेतकऱ्यांकडे चारा शिल्लक राहिला नसल्यान अहमदनगर जिल्ह्यातून चारा विकत आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. परिणामी जे शेतकरी पशुधनावर खर्च करू शकत नाही त्यांच्यावर पशुधन विक्री करण्याची वेळ आली आहे. यामुळे कडा येथील आठवडी बाजारात पशुधन मोठ्या संख्येने विक्रीस आल्याचे दिसून आले. आष्टी तालुक्यात डोंगरदऱ्याचा परिसर मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे जनावरांचा चारा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. यामुळे तालुक्यात तब्बल तीन लाख लिटरपेक्षा अधिक दुग्धसंकलन होते. यासह तालुक्यातील अनेक मजूर उसतोडीसही जातात. त्यांच्याकडेही बैलांसह इतर पशुधन असते. शेतकऱ्यांकडे तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक पशुधन आहे. दुग्धोत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांकडे आर्थिक सुबत्ताही आलेली आहे. असे असले तरी दीड महिना झाला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. तालुक्यातील तीनशेपेक्षा अधिक वाडी-वस्त्यांवर सध्या पिण्याचे पाणी मिळणेही दुर्लभ झाले आहे. परिणामी येथे दोनशेपेक्षा अधिक टॅँकर सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याचेच दुर्भिक्ष असल्याने जनावरांसाठी कोठून पाणी आणणार असाही प्रश्न आहे. पाणीटंचाईमुळे हिरवा चाराही शेतकऱ्यांकडे नाही. परिणामी उसाची मोळी ५० ते ६० रुपयांना विक्री होऊ लागली आहे. चारा महागल्याने पशुधनाचा खर्च वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपले पशुधन कडा येथील जनावरांच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी आणल्याचे चित्र दिसून आले. यामुळेही पशुधनाचे दरही उतरले आहेत. ९० हजारांना मिळणारी बैलजोडी ६० हजारांना मिळू लागली आहे. तर, ६० हजारांची गाय ४० हजारांना, ७० हजारांची म्हैस ५५ हजारांना विक्री होऊ लागल्याचे शेतकरी बाबासाहेब तळेकर यांनी सांगितले. काही शेतकरी नगर जिल्ह्यातून चारा आणत असल्याचे आदीनाथ करडुळे, मारोती औटे, माणिक तळेकर यांनी सांगितले. पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही होत आहे. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक राठोड म्हणाले, चाराटंचाईमुळे शेतकरी अडचणीत आले असल्याने पशुधनाची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)