शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जिल्ह्यात ५९ गावांवर टंचाईचे सावट

By admin | Updated: June 29, 2014 00:45 IST

जालना : मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रात जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. आर्द्रता वाढत असल्याने जलसाठे कोरडे होत आहेत.

जालना : मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रात जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. आर्द्रता वाढत असल्याने जलसाठे कोरडे होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २५ गावे आणि ८ वाड्यांमध्ये ३१ टँकर सुरू आहेत. तर ५९ गावे आणि १० वाड्यांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. १५ जुलैपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास उपाययोजनांसंदर्भात निधी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आकस्मिक आराखडा पाठवावा, असे आदेश शासनाने दिले आहेत.जून महिना संपत आला तरीही अद्याप जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस आलाच नाही. शहरी व ग्रामीण भागात लोक पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात पेरणीची कामे खोळंबली असून बळीराजा चिंतीत झाला आहे. १६ लघू व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले असून बहुतांश जलसाठ्यांमधील पाणीपातळी कमी झाली आहे. गेल्या महिनाभरापर्यंत जिल्ह्यात टँकरद्वारे १० ते १२ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू होता. आता टंचाईग्रस्त गावांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील महिला-पुरूषांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सादर झालेल्या टंचाई कृती पुरवणी आराखड्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरीही दिली होती. मात्र ही उपाययोजना जून २०१४ पर्यंतच असल्याने सद्यस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात टँकरची तसेच विहिरींची अधिग्रहण संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाणीटंचाई हळूहळू रौद्र रूप धारण करू लागल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. २०१३ मधील भयावह दुष्काळाची आठवण लोकांना होऊ लागली आहे. मात्र शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतील उपलब्ध जलसाठा आगामी तीन महिने पुरेल एवढा आहे. मात्र पाणी वितरणासाठी प्रशासनाला वेळप्रसंगी तयारी करावी लागेल, अशी चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत संभाव्य टंचाई लक्षात घेता करावयाच्या उपाययोजनांचा ‘आकस्मिक आराखडा’ तयार करण्याचे आदेश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)निवारणास मुदतवाढ देण्याची मागणीभूजल सर्वेक्षण विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद यांच्या एका पथकाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात १५ जुलैपर्यंत जिल्ह्यात ५९ गावे व १० वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सचिवांसमवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सींमध्ये जिल्हाधिकारी २ नायक यांनी जिल्ह्यात टंचाई निवारण कृती कार्यक्रमाला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली. जिल्ह्यातील जलसाठ्यांमधील पाणी हे पिण्यासाठीच वापरण्यात येणार आहे.