शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीत प्रशासकीय कार्यालयांचाही वाटा

By admin | Updated: May 12, 2015 00:52 IST

राजेश खराडे , बीड परिमंडळात सर्वाधिक थकबाकी बीड मंडळाकडे आहे. दुष्काळी परिस्थितीचे निमित्त करून ग्रामीण भागातील वसुलीला ब्रेक बसला आहे

राजेश खराडे , बीडपरिमंडळात सर्वाधिक थकबाकी बीड मंडळाकडे आहे. दुष्काळी परिस्थितीचे निमित्त करून ग्रामीण भागातील वसुलीला ब्रेक बसला आहे तर प्रशासकीय कार्यालयांच्या उदासिनतेमुळे एकूण थकबाकीचा जवळपास निम्मा भार प्रशासकीय कार्यालयांनी उचलला आहे.जिल्ह्यातील नगरपालिका व पाणीपुरवठा विभागाकडे ३३०७ कनेक्शनच्या बदल्यात महावितरणची तब्बल १४५ कोटी ५८ लाख २२ हजार ऐवढी थकबाकी आहे. मार्च महिन्यात महावितरणकडून विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही ग्रामीण भागातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरण ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास पोहचले होते. मात्र ग्रामीण भागातूनही वसुली होत असताना पाणीपुरवठा विभाग व नगरपालिकेच्या पथदिव्यांकडील वसुलीकडे महावितरणचे दुर्लक्ष झाले आहे. या दोन्ही विभागाची अधिक थकबाकी असूनही महावितरणकडून केवळ नोटीसाशिवाय अन्य कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. वसुली मोहिमेदरम्यान घरगुती, व्यापारी, औद्योगिक वर्गाकडून सरासरीइतकी वसुली झाली आहे. असे असतानाही गेल्या महिनाभरापासून विद्युत पुरवठा दुरूस्ती कामामुळे विस्कळीत झाला आहे. एकीकडे वीज बिलांचा भरणा करूनही ग्राहकांना सुरळीत सेवा भेटत नाही तर दुसरकीडे प्रशासकिय कार्यालयांकडून ‘पुढचे पाठ अन् मागचे सपाट’ असे सुरू आहे. केवळ चालू बिले भरली जात आहेत. त्यांना सेवा मात्र अखंडीत आहे. बीड नगरपालिकेला महिन्याकाठी ७ ते ८ लाख रुपयांचे बिल येते तर थकबाकी १२० कोटींच्या घरात आहे. नगरपालिकेकडून केवळ महिन्याचे बिल अदा केले जात आहे. १२० कोटींच्या थकबाकीकडे महावितरणचेही दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे बीड नगरपालिकेकडे सर्वाधिक १६ कोटी ४० लाखाची थकबाकी आहे.शहरातील पथदिव्यांची संख्या २२६ एवढीच आहे. शहरातील शाहू नगर, अंबिका चौक, स्वराज्यनगर, पंचशीलनगर आदी भागातील पथदिव्यांचे डायरेक्ट कनेक्शन करण्यात आल्यानेच दिवसाही पथदिवे हे सुरूच राहत आहे.महावितरणकडून विद्युत खांबावरील टायमर स्वीच खराब असल्याचा बोलबाला केला जात आहे. पथदिवे वापरत असलेल्या विजेचे मुल्य सामान्यांच्या बीलात समावेश केले जाते. अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या खिशातूनच महावितरण वसुली करीत आहे. नगरपालिकेचे पथदिवे आणि पाणीपुरवठा विभागातून सर्वसामान्य नागरिकांना होणारा पाणीपुरवठा हे दोन्हीही विभाग प्रत्यक्ष जनतेशी जोडले गेले आहेत. विद्युत पुरवठा खंडीत केल्यास सर्वसामान्य नागरिकांची अडचण होणार आहे. नगर पालिकेला वेळोवेळी थकबाकीसंदर्भात नोटिसा दिल्या असल्याचे जिल्हा अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.