शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

थकबाकीत प्रशासकीय कार्यालयांचाही वाटा

By admin | Updated: May 12, 2015 00:52 IST

राजेश खराडे , बीड परिमंडळात सर्वाधिक थकबाकी बीड मंडळाकडे आहे. दुष्काळी परिस्थितीचे निमित्त करून ग्रामीण भागातील वसुलीला ब्रेक बसला आहे

राजेश खराडे , बीडपरिमंडळात सर्वाधिक थकबाकी बीड मंडळाकडे आहे. दुष्काळी परिस्थितीचे निमित्त करून ग्रामीण भागातील वसुलीला ब्रेक बसला आहे तर प्रशासकीय कार्यालयांच्या उदासिनतेमुळे एकूण थकबाकीचा जवळपास निम्मा भार प्रशासकीय कार्यालयांनी उचलला आहे.जिल्ह्यातील नगरपालिका व पाणीपुरवठा विभागाकडे ३३०७ कनेक्शनच्या बदल्यात महावितरणची तब्बल १४५ कोटी ५८ लाख २२ हजार ऐवढी थकबाकी आहे. मार्च महिन्यात महावितरणकडून विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही ग्रामीण भागातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरण ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास पोहचले होते. मात्र ग्रामीण भागातूनही वसुली होत असताना पाणीपुरवठा विभाग व नगरपालिकेच्या पथदिव्यांकडील वसुलीकडे महावितरणचे दुर्लक्ष झाले आहे. या दोन्ही विभागाची अधिक थकबाकी असूनही महावितरणकडून केवळ नोटीसाशिवाय अन्य कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. वसुली मोहिमेदरम्यान घरगुती, व्यापारी, औद्योगिक वर्गाकडून सरासरीइतकी वसुली झाली आहे. असे असतानाही गेल्या महिनाभरापासून विद्युत पुरवठा दुरूस्ती कामामुळे विस्कळीत झाला आहे. एकीकडे वीज बिलांचा भरणा करूनही ग्राहकांना सुरळीत सेवा भेटत नाही तर दुसरकीडे प्रशासकिय कार्यालयांकडून ‘पुढचे पाठ अन् मागचे सपाट’ असे सुरू आहे. केवळ चालू बिले भरली जात आहेत. त्यांना सेवा मात्र अखंडीत आहे. बीड नगरपालिकेला महिन्याकाठी ७ ते ८ लाख रुपयांचे बिल येते तर थकबाकी १२० कोटींच्या घरात आहे. नगरपालिकेकडून केवळ महिन्याचे बिल अदा केले जात आहे. १२० कोटींच्या थकबाकीकडे महावितरणचेही दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे बीड नगरपालिकेकडे सर्वाधिक १६ कोटी ४० लाखाची थकबाकी आहे.शहरातील पथदिव्यांची संख्या २२६ एवढीच आहे. शहरातील शाहू नगर, अंबिका चौक, स्वराज्यनगर, पंचशीलनगर आदी भागातील पथदिव्यांचे डायरेक्ट कनेक्शन करण्यात आल्यानेच दिवसाही पथदिवे हे सुरूच राहत आहे.महावितरणकडून विद्युत खांबावरील टायमर स्वीच खराब असल्याचा बोलबाला केला जात आहे. पथदिवे वापरत असलेल्या विजेचे मुल्य सामान्यांच्या बीलात समावेश केले जाते. अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या खिशातूनच महावितरण वसुली करीत आहे. नगरपालिकेचे पथदिवे आणि पाणीपुरवठा विभागातून सर्वसामान्य नागरिकांना होणारा पाणीपुरवठा हे दोन्हीही विभाग प्रत्यक्ष जनतेशी जोडले गेले आहेत. विद्युत पुरवठा खंडीत केल्यास सर्वसामान्य नागरिकांची अडचण होणार आहे. नगर पालिकेला वेळोवेळी थकबाकीसंदर्भात नोटिसा दिल्या असल्याचे जिल्हा अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.