शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

थकबाकीत प्रशासकीय कार्यालयांचाही वाटा

By admin | Updated: May 12, 2015 00:52 IST

राजेश खराडे , बीड परिमंडळात सर्वाधिक थकबाकी बीड मंडळाकडे आहे. दुष्काळी परिस्थितीचे निमित्त करून ग्रामीण भागातील वसुलीला ब्रेक बसला आहे

राजेश खराडे , बीडपरिमंडळात सर्वाधिक थकबाकी बीड मंडळाकडे आहे. दुष्काळी परिस्थितीचे निमित्त करून ग्रामीण भागातील वसुलीला ब्रेक बसला आहे तर प्रशासकीय कार्यालयांच्या उदासिनतेमुळे एकूण थकबाकीचा जवळपास निम्मा भार प्रशासकीय कार्यालयांनी उचलला आहे.जिल्ह्यातील नगरपालिका व पाणीपुरवठा विभागाकडे ३३०७ कनेक्शनच्या बदल्यात महावितरणची तब्बल १४५ कोटी ५८ लाख २२ हजार ऐवढी थकबाकी आहे. मार्च महिन्यात महावितरणकडून विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही ग्रामीण भागातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरण ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास पोहचले होते. मात्र ग्रामीण भागातूनही वसुली होत असताना पाणीपुरवठा विभाग व नगरपालिकेच्या पथदिव्यांकडील वसुलीकडे महावितरणचे दुर्लक्ष झाले आहे. या दोन्ही विभागाची अधिक थकबाकी असूनही महावितरणकडून केवळ नोटीसाशिवाय अन्य कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. वसुली मोहिमेदरम्यान घरगुती, व्यापारी, औद्योगिक वर्गाकडून सरासरीइतकी वसुली झाली आहे. असे असतानाही गेल्या महिनाभरापासून विद्युत पुरवठा दुरूस्ती कामामुळे विस्कळीत झाला आहे. एकीकडे वीज बिलांचा भरणा करूनही ग्राहकांना सुरळीत सेवा भेटत नाही तर दुसरकीडे प्रशासकिय कार्यालयांकडून ‘पुढचे पाठ अन् मागचे सपाट’ असे सुरू आहे. केवळ चालू बिले भरली जात आहेत. त्यांना सेवा मात्र अखंडीत आहे. बीड नगरपालिकेला महिन्याकाठी ७ ते ८ लाख रुपयांचे बिल येते तर थकबाकी १२० कोटींच्या घरात आहे. नगरपालिकेकडून केवळ महिन्याचे बिल अदा केले जात आहे. १२० कोटींच्या थकबाकीकडे महावितरणचेही दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे बीड नगरपालिकेकडे सर्वाधिक १६ कोटी ४० लाखाची थकबाकी आहे.शहरातील पथदिव्यांची संख्या २२६ एवढीच आहे. शहरातील शाहू नगर, अंबिका चौक, स्वराज्यनगर, पंचशीलनगर आदी भागातील पथदिव्यांचे डायरेक्ट कनेक्शन करण्यात आल्यानेच दिवसाही पथदिवे हे सुरूच राहत आहे.महावितरणकडून विद्युत खांबावरील टायमर स्वीच खराब असल्याचा बोलबाला केला जात आहे. पथदिवे वापरत असलेल्या विजेचे मुल्य सामान्यांच्या बीलात समावेश केले जाते. अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या खिशातूनच महावितरण वसुली करीत आहे. नगरपालिकेचे पथदिवे आणि पाणीपुरवठा विभागातून सर्वसामान्य नागरिकांना होणारा पाणीपुरवठा हे दोन्हीही विभाग प्रत्यक्ष जनतेशी जोडले गेले आहेत. विद्युत पुरवठा खंडीत केल्यास सर्वसामान्य नागरिकांची अडचण होणार आहे. नगर पालिकेला वेळोवेळी थकबाकीसंदर्भात नोटिसा दिल्या असल्याचे जिल्हा अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.