शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

आदेश नसल्याने विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल

By admin | Updated: October 29, 2015 00:21 IST

लातूर : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला, तरी तसे शाळा-महाविद्यालयांना विद्यापीठ

लातूर : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला, तरी तसे शाळा-महाविद्यालयांना विद्यापीठ व बोर्डाकडून आदेश नसल्यामुळे परीक्षा शुल्क वसुली सुरूच आहे. सध्या दहावीची परीक्षा फीस भरण्याची मुदत असल्याने विद्यार्थी शुल्क भरूनच परीक्षा फॉर्म भरत आहेत.लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यांची नजर आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. या नजर आणेवारीनुसार जिल्ह्यातील दहाही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार आहे. परंतु, सध्या शुल्क आकारले जात आहे. दहावीसाठी ४२० रुपये तर बारावीसाठी ४७० रुपये शुल्क आहे. दहावीसाठी परीक्षा शुल्क भरण्याची मुदत ३१ आॅक्टोबरपर्यंत आहे. शासनाने शुल्क माफीचा निर्णय जाहीर करून आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. परंतु, एकाही शाळा-महाविद्यालयाला शुल्क घेऊ नये, असे आदेश विद्यापीठ अथवा बोर्डाने दिले नाहीत. बारावीसाठी परीक्षा शुल्क भरण्याची मुदत ३१ आॅगस्टलाच संपली आहे. या मुदतीतच विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून परीक्षा फॉर्म भरला आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडूनही विद्यापीठ नियमानुसार परीक्षा शुल्क घेतले आहेत. गतवर्षीही दुष्काळ असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शुल्क माफ होती. गतवर्षीच्या निर्णयात केवळ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भरलेले परीक्षा शुल्क आता वाटप केले जात आहेत. गतवर्षीचे ३५५ रुपये बारावीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सर्वच महाविद्यालयांत सुरू आहे. यंदा दहावीसाठी ४२० आणि बारावीसाठी ४७० रुपये असे सर्वसाधारणपणे परीक्षा शुल्क आहे. ते सर्वच शाळा-महाविद्यालयांकडून आकारण्यात आले आहे. मग शुल्क माफीचा निर्णय कधी अंमलात येणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)टंचाईग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या गतवर्षीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झाले असून, त्याचे वाटप सर्वच शाळा-महाविद्यालयांत सुरू आहे. दयानंद कला महाविद्यालयातील बारावीच्या १८५ विद्यार्थ्यांना ३५५ रुपये प्रमाणे शुल्क परत केले जात आहे. या महाविद्यालयातून १८५ विद्यार्थ्यांना ६५ हजार ६७५ रुपयांचे वाटप केले असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली.पदवीधर विद्यार्थ्यांच्या शुल्काचे काय..?४गतवर्षी केवळ दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले होते. वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले नव्हते. यंदाच्या माफीत वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे की नाही, याबाबत संभ्रम आहे. बी.ए. प्रथम व द्वितीय वर्षासाठी ३०० रुपये आणि तृतीय वर्षासाठी ३५० रुपये परीक्षा शुल्क आहे. केवळ परीक्षा शुल्क माफीचा हा निर्णय आहे. आणि ई,बी,सीची सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच तो आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असल्यामुळे त्यांना हा शुल्क माफीचा निर्णय नाही, असे शहरातील प्राचार्य, मुख्याध्यापकांनी सांगितले.