शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

गाळ काढणीमुळे मातीचे झाले सोने

By admin | Updated: April 22, 2016 00:41 IST

हिंगोली : तालुक्यातील भांडेगाव, थोरजवळा, नांदुरा, आडगाव या गावांतील तलावासह हिंगोलीतील गणेशवाडी भागातील तलावातून गाळ गाढण्यास महिनाभरापासून सुरुवात झाली आहे.

हिंगोली : तालुक्यातील भांडेगाव, थोरजवळा, नांदुरा, आडगाव या गावांतील तलावासह हिंगोलीतील गणेशवाडी भागातील तलावातून गाळ गाढण्यास महिनाभरापासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पाचही तलावांतून ४९ हजार ४७५ ब्रास गाळ काढण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे. तालुक्यातील पाच ठिकाणच्या तलावातून काढण्यात येणाऱ्या तलावातील गाळामुळे १०५ शेतकऱ्यांची जमीन सुपीक झाली असून, तलावाची खोली वाढण्यास मदत झाली आहे. यात आडगाव- भिंगी येथील तलावावर ४ जेसीबी यंत्रांच्या साह्याने २५ टॅक्टरद्वारे २५ शेतकरी काढलेला गाळ आपल्या शेतात नेऊन टाकत आहेत. तर त्या ठिकाणी आजघडीला २० हजार ८७५ ब्रास गाळ काढण्यात आला आहे. तसेच थोरजवळा येथील तलावावर ४ जेसीबीच्या साह्याने २२ ट्रॅक्टरद्वारे २२ शेतकरी आपापल्या शेतात गाळ नेऊन टाकत असल्याने, तळ्यातील १९ हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे. तसेच नांदुरा येथील पाझर तलावातून एका जेसीबीच्या साह्याने ६ शेतकरी आपापल्या शेतात गाळ टाकून घेत असल्याने आजघडीला ३०० ब्रास गाळ काढण्यात आला आहे. भांडेगाव येथील तलावातून दोन जेसीबीच्या साह्याने १० ट्रॅक्टरद्वारे गाळ काढण्यात येत आहे. यात ७ हजार २०० ब्रास गाळ काढण्यात आला आहे. तर गणेशवाडी भागातील चिरागशाह परिसरातील तलावातून दोन जेसीबीच्या साह्याने २० ट्रॅक्टरद्वारे गाळ गाढण्याचे काम सुरु असून, येथील गाळ ३६ शेतकरी घेवून जात आहेत. आतापर्यत १८४ एकरामध्ये गाळ टाकण्यात आल्याची नोंद तहसीलकडे झाली आहे. तहसीलस्तरावर गाळ काढणीचे नियोजन लावण्यात येत असून, आठवड्यानुसार संबंधित ठिकाणच्या तलावातून गाळ काढल्याची नोंद केली जात आहे. संबंधित भागातील शेतकऱ्यांनी तलावातील गाळ उपसून आपल्या शेतात नेऊन टाकून शेतीची सुपीकता वाढवावी, जेणेकरुन येत्या काही वर्षात आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे नायब तहसीलदार सचिन जैस्वाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)