शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

कामेच नसल्याने जलसंपदाला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:50 IST

जिल्ह्याला जलसंपदाचे स्वतंत्र कार्यालय व मनुष्यबळ नसल्याने कायम परावलंबी राहावे लागत होते. कार्यकारी अभियंत्यांसह उपविभाग मंजूर झाल्यानंतरही पुन्हा तेच चित्र निर्माण झाले असून काही कार्यालये तर कुलूपबंदच राहात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याला जलसंपदाचे स्वतंत्र कार्यालय व मनुष्यबळ नसल्याने कायम परावलंबी राहावे लागत होते. कार्यकारी अभियंत्यांसह उपविभाग मंजूर झाल्यानंतरही पुन्हा तेच चित्र निर्माण झाले असून काही कार्यालये तर कुलूपबंदच राहात आहेत.हिंगोली येथे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय आले. मात्र कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व इतर तांत्रिक पदे रिक्त आहेत. केवळ कारकुनी कर्मचारी हजर असतात. त्यापैकीही काही या अनागोंदीचा फायदा घेण्यात यशस्वी होत आहेत. हिंगोली उपविभागाच्या अधिकाºयांकडेच हा सर्व पदभार आहे. त्यांच्याकडे हा विभाग अतिरिक्त पदभाराचा असल्याने आपले काम सांभाळून ते सोयीनुसार या कार्यालयाचा कारभार पाहतात. बैठका व इतर महत्त्वपूर्ण बाबी वगळता त्यांनाही वेगळ देणे शक्य नाही. तर नवीन कोणतीच कामे नसल्याने येथे कोणी इतर अधिकारी यायला तयार नाही. अनुशेष मंजूर झाल्याशिवाय कोणी येईल, याचीही सुतराम शक्यता नाही. मात्र तूर्त तरी हे कार्यालय अधून-मधून गजबजलेले व कायम ओसच पडलेले पहायला मिळते. या कार्यालयाचे इतर उपविभाग तर कुलूपबंदच असतात.या विभागात कार्यकारी अभियंता-१, उपकार्यकारी अभियंता -१, उपविभागीय अभियंता-३, कनिष्ठ व शाखा अभियंता-१८, लेखापाल-१, आरेखक-१, सहायक आरेखक-१, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक- १२, अनुरेखक ३, वरिष्ठ लिपिक-५, कनिष्ठ लिपिक-१0, टंकलेखक ६, वाहनचालक ५, शिपाई ९ अशी एकूण ८४ पदे जिल्हाभरातील कार्यालयांत रिक्त आहेत. तर केवळ ४0 जणांवर या विभागाचा कारभार चालत आहे. त्यातच तीन उपविभाग व विभागाला प्रमुख अधिकाºयांचीच पदे रिक्त असल्याने कुलूपबंद राहिल्यास कोणी लक्ष देण्यासही तयार नाही. त्यामुळे या कार्यालयाकडे लक्ष देण्यासाठी आधी त्यांना विविध कामांना निधी मंजूर करून देणे गरजेचे आहे. तसे झाल्यास येथे येण्यास अधिकारीही उत्सुक राहतील, असे चित्र आहे.