शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेतीतील विज्ञानाकडे दुर्लक्षामुळे दुष्काळ

By admin | Updated: June 27, 2016 01:02 IST

औरंगाबाद : राजस्थानात ३०० मि. मी. पाऊस पडूनही तेथे पाणीपुरवठ्यावर एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. त्या तुलनेत मराठवाड्यात पडणारा पाऊस किती तरी अधिक आहे

औरंगाबाद : राजस्थानात ३०० मि. मी. पाऊस पडूनही तेथे पाणीपुरवठ्यावर एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. त्या तुलनेत मराठवाड्यात पडणारा पाऊस किती तरी अधिक आहे. तरी आपल्याकडे पाणीटंचाई जाणवते. शेती बेभरवशाची झाली आहे. त्याला प्रामुख्याने जुन्या शेती परंपरेतील विज्ञानाकडे झालेले दुर्लक्ष आणि शेतीचा नष्ट झालेला मूळ आधार या गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणून सद्य:स्थितीवर मात करायची असेल तर येत्या काळात शेतीच्या परंपरा, त्यातील विज्ञान आणि जीवनपद्धती यांची सांगड घालावी लागेल, तसेच पावसाला सुसंगत पिके घ्यावी लागतील, असे मत शेती क्षेत्राचे अभ्यासक आणि उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी व्यक्त केले.तरुण पत्रकारांच्या वतीने आयोजित अभ्यास वर्गात ते बोलत होते. ‘बेभरवासी पाऊस आणि मराठवाड्यातील शेती’ या विषयावर त्यांनी विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले, दुष्काळ हा काही आजचा नाही. अगदी यंदाच्या दुष्काळापेक्षाही किती तरी वेळा औरंगाबादेत आणि मराठवाड्यात दुष्काळ पडल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. परंतु त्यावेळी परंपरागत शेतीत एक अशी जीवनपद्धती अस्तित्वात होती की, ज्यामुळे दुष्काळावर मात करणे शक्य होते. आज आपल्याकडे सरासरी ७०० मि. मी. पाऊस पडतो. म्हणजे शेतीत एकरी ७० लाख लिटर पाणी पडते, पण दुर्दैवाने त्यातील २५ ते ३० लाख लिटर पाण्याचे बाष्पीभवन होते हे अभ्यासात आढळून आले आहे. पूर्वी बांधावर विशिष्ट प्रकारच्या वनस्पती असत. त्या जमिनीतील पाणी धरून ठेवत, बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करीत. आज वनस्पतीही बदलल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून आज बाष्पीभवन ही शेतीसमोरील सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. पूर्वी पाणवठे संरक्षित करण्याचे कौशल्य अवगत होते. शिवाय पशुआधारित शेती हा शेतीचा मूळ आधार होता. आता हा आधारच नष्ट झाला आहे. अलीकडच्या काळात उपलब्ध पाण्याचा विचार न करता पिके घेतली जात आहेत. कापूस हे सरासरी ७०० मि. मी. पावसावर येणारे पीक आहे. मात्र आपल्याकडे वैजापूरसारख्या ३०० मि. मी. सरासरी पाऊस असलेल्या तालुक्यातही कापसाचे क्षेत्र वाढते आहे.यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. म्हणून येत्या काळात पाणी शेतात मुरेल अशा वनस्पती बांधावर लावाव्या लागतील. पावसाला सुसंगत अशी ४०० मि. मी.वर सरासरी येणारी पिके आणि २-३ महिन्यांत येणारी पिके यांची सांगड घालावी लागेल, तरच आपली शेती पुन्हा पूर्वपदावर येईल, असेही देवळाणकर म्हणाले.