शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पावसाअभावी पैठणमधील १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:03 IST

गतवर्षी १९ जूनपर्यंत ५२ टक्के क्षेत्र पेरणीखाली आले होते. यंदा मात्र १ जूनला हजेरी लावल्यानंतरही पावसाने दडी मारल्याने पेरण्या ...

गतवर्षी १९ जूनपर्यंत ५२ टक्के क्षेत्र पेरणीखाली आले होते. यंदा मात्र १ जूनला हजेरी लावल्यानंतरही पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पैठण तालुक्यात खरिपाच्या पिकाखाली एकूण १,०९,०५० हेक्टर क्षेत्र येते. यापैकी सिंचनाची सोय असलेल्या १०,९०० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. जवळपास १ लाख हेक्टर क्षेत्रावर अद्यापही पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे. सलगपणे १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला, तरच पेरणीस प्रारंभ करता येईल. हवामान खात्याने येत्या चार दिवसांत चांगले पर्जन्यमान होईल, असे भाकीत वर्तविले असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सोयाबीन पिकाखाली पैठण तालुक्यात सरासरी १,२६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड होत असते. यंदा मात्र या पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन, तीन वर्षांपासून मका पिकाला भाव नसल्याने व सोयाबीनला ८ ते १० हजारांपर्यंत अनपेक्षित भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढला आहे. दरम्यान, पेरणीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी बियाणे, खते खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.

पैठण तालुक्यात आतापर्यंत

सरासरी ५६.९० मि.मी. पावसाची नोंद

तालुक्यात आतापर्यंत सरासरी ५६.९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या तारखेपर्यंत १२७.५० मि.मी. पाऊस पडला होता. दहा महसूल मंडळांपैकी विहामांडवा मंडळात सरासरी ९० मि.मी. असा बऱ्यापैकी पाऊस झाला असून, येथे शेतकरी पेरणी करीत आहेत. ढोरकीन, पाचोड, बालानगर या महसूल मंडळांत मात्र सरासरी ४० मि.मी.पेक्षाही कमी पर्जन्यमान झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.