शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महागाईमुळे समांतरचे पाणी-पाणी!

By admin | Updated: June 24, 2014 01:07 IST

औरंगाबाद : महापालिकेने शहरासाठी तयार केलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनी योजनेने तीन वर्षे गटांगळ्या खाल्ल्या.

औरंगाबाद : महापालिकेने शहरासाठी तयार केलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनी योजनेने तीन वर्षे गटांगळ्या खाल्ल्या. महागाईमुळे त्या योजनेचेच पाणी- पाणी होण्याची वेळ आली आहे. सप्टेंबर २०११ ते मे २०१४ या काळात वाढलेल्या जिल्हा दरसूचीप्रमाणे योजनेचा खर्च सुमारे २०० कोटी रुपयांनी वाढला आहे. हा खर्च कुणाच्या हलगर्जीपणामुळे वाढला आहे. याचा काथ्याकुट करणारी पहिली बैठक आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झाली.मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व टीम आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी (एसीडब्ल्यूयूसीएल)चे व्यवस्थाकीय संचालक माहेश्वरी, कार्यकारी अभियंता श्रीरंग देशपांडे व प्रतिनिधींची बैठकीला उपस्थिती होती. २ महिन्यांत २०० कोटींसाठी पर्याय सापडल्यानंतर समांतर जलवाहिनीच्या कामाचा मार्ग मोकळा होईल. २०० कोटींचा बोजा नागरिकांवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा आहेत अडचणीकेंद्राकडे २०० कोटींची मदत मागणे अशक्य आहे. त्यासाठी मनपाला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. राज्य शासनाकडे योजनेच्या महागाईची माहिती दिली. वाढीव रकमेबाबत नगरविकास खात्याचे सचिव श्रीकांत सिंह यांनी हात वर केले, तर आता केंद्रात सत्तांतर झाले आहे. योजनेला गेल्या सरकारने मंजुरी दिली आहे. २०० कोटी मोदी सरकारने दिल्यास योजनेसाठी अच्छे दिन येऊ शकतात. मनपावर २०० कोटींचे कर्ज असल्याने नवीन कर्ज काढण्याची क्षमता नाही. मनपा व एसीडब्ल्यूयूसीएलमधील बैठकीतील चर्चा 1२०० कोटींचा पर्याय येत नाही तोवर हस्तांतरण नाही.2एसीडब्ल्यूयूसीएल च्या बोर्ड डायरेक्टरची बैठक होणार.3एसीडब्ल्यूयूसीएल बँकेसोबत चर्चा करणार.4मनपा आणि एसीडब्ल्यूयूसीएल यांच्यातही बैठका.5औरंगाबादकरांसाठी योजना महत्त्वाची आहे.6एसीडब्ल्यूयूसीएलला केंद्राकडे मदत मागता येईल.7मनपा व औरंगाबादकर २०० कोटींचा बोजा सहन करणार नाहीत.8प्रकल्प विकास अहवालात १२ टप्पे ठरतील.9कंपनीला ८० कोटींची बँक गॅरंटी द्यावी लागेल.10मनपाची बँक गॅरंटीची रक्कम तयार आहे.२०० कोटींच्या पर्यायानंतर हस्तांतरण बैठकीतील चर्चेची माहिती देताना आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले की, योजनेच्या कामाला उशीर कुणामुळे झाला? असा प्रश्न कंपनीने केला. मनपामुळे उशीर झालेला नाही, असे स्पष्टपणे सांगितले. येत्या आठवड्यात मनपा व एसीडब्ल्यूयूसीएलचे प्रतिनिधी यांच्यात बैठका होतील. कागदपत्रांची पूर्तता होईल. ४ आठवड्यात अंतिम निर्णय व्हावा, अशी अपेक्षा आहे.योजना २०० कोटींनी महागली आहे, ती रक्कम कुठून आणायाची याचा निकाल लागणे महत्त्वाचे आहे. कर्ज काढण्याची व नागरिकांवर बोजा टाकण्याची मनपाची तयारी नाही.