शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

घरातील फरशी तापल्याने गूढ वाढले

By admin | Updated: May 27, 2017 00:41 IST

जाफराबाद : ताल्युक्यातील भीमराव किसनराव अंभोरे यांच्या घरातील एकाच खोलीतील फरशी प्रचंड तापल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : ताल्युक्यातील भीमराव किसनराव अंभोरे यांच्या घरातील एकाच खोलीतील फरशी प्रचंड तापल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरातील एकाच ठिकाणची फरशीवर उभे राहणे शक्य नाही. त्यामुळे ज्वालामुखी आहे की पाण्याच्या वाफेमुळे होतेय याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पंचवीस वर्षांपूर्वी किल्लारी भूकंपाच्या वेळेस गावात सौम्य धक्के जाणवले होते. भिमराव किसनराव अंभोरे यांचे गावात भर वस्तीत घराचे पाच वर्षां पूर्वी बांधकाम करण्यात आले आहे. याच घरात बैठक खोलीला लागून एक खोली आहे. उन्हाळ्यातील गरमीचे दिवस असल्याने भागूबाई भीमराव अंभोरे या रात्री गच्चीवर झोपण्यासाठी गेल्या होत्या. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान झोपेतून उठून घरात आले असताना खोलीतील फक्त बारा फरशा तापल्याचे लक्षात आले.एकाच ठिकाणी फरशी तापल्याचे पाहून एक फरशी खोदून काढली असता खोदकाम केल्याच्या ठिकाणी पाणी टाकून पाहिली असता पाणी सुद्धा गरम झाले. त्यामुळे घरातील सदस्य आणि ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. या गूढ घटनेची माहिती तहसील कार्यालयासही कळविण्यात आली. मंडळ अधिकारी एस. डी. भदरर्गे, तलाठी विजय गरड, व्ही. आर. इंगोले, अ‍ॅड रामेशवर अंभोरे, माजी सरपंच विजय अंभोरे यांनी घटना स्थळाची पाहणी करून याची माहिती तहसीलदार यांना दिली. या विषयी तहसीलदार जे.डी.वळवी म्हणाले याची माहिती पोलिसांना दिली आहे. भूजल सर्व्हेक्षण विभागाला माहिती देण्यात येऊन सद्या स्थितीत घरातील कुटुंबास सावध राहून तात्पुरती इतरत्रे व्यवस्था करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.