शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

दुष्काळातही वसुलीचा तगादा

By admin | Updated: January 2, 2015 00:47 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जितराब जगविण्याचे मोठे आव्हाण बळीराजाच्या पुढे उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे.

 व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जितराब जगविण्याचे मोठे आव्हाण बळीराजाच्या पुढे उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. त्याच मायबाप सरकारने आता शेतसाऱ्यासाठी बळीराजाकडे तगादा लावला आहे. शेतसारा भरावयाची रक्कम जरी लहान असली तरी ती भरावीच लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात ८ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. मागील तीन वर्षापासूनच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शासनाने बीड जिल्ह्यात १०० दुष्काळ असल्याचे सांगितले. यामध्ये १४०४ पैकी सर्वच गावांतील पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे. एक एक्कर क्षेत्रातील कापसाला ३० ते ४० किलो कापसाचा उतारा येत आहे. चाऱ्या अभावी शेतकऱ्यांनी जनावरे बाजारात नेहून मातीमोल किमतीत विकले आहेत. एकंदरीत अशी जिल्ह्यातील परिस्थिती असताना देखील शेतकऱ्यांकडून जमीनींचा शेतसारा भरून घेतला जात असल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले. एकीकडे शासन दुष्काळी भागासाठी विविध योजना राबवित आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना साधा शेतसारा देखील माफ केला जात नसल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.तीन हेक्टर क्षेत्रासाठी ५००ज्या शेतकऱ्याचे तीन हेक्टर क्षेत्र असेल त्या शेतकऱ्याला पाचशे रूपयांपर्यंतची रक्कम संबंधीत तलाठी कार्यालयांकडे भरावी लागत असल्योच शिरूर कासार तालुक्यातील शेतकरी नामदेव सानप यांनी सांगितले.शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्षजिल्ह्यातील १४०४ गावांमधील पिकांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे़ यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक टंचाईत सापडला आहे़ जिल्हा प्रशासनाने दुष्काळाचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे़ शेतकऱ्यांसाठी नेमकी मदतीची रक्कम किती असेल ? हे आताच सांगणे शक्य नाही़ मात्र, १५ दिवसात मदत येण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले़शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या शेतसारा वसूलीमध्ये जि. प. च्या वतीने करण्यात आलेल्या वसूलीची रक्कम ३८ लाख ३६ हजार रूपये आहे तर ग्रा. प. स्तरावर घेण्यात येणारा उपकर १ लाख ४ हजार रूपये डिसेंबर दरम्यान पर्यंत जमा झालेला असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.