शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दुष्काळामुळे जिल्ह्याला नऊ हजार विहिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:33 IST

रोहयो : प्रत्येक ग्रामपंचायत पाच विहिरींची कामे सुरु करणार

सोयगाव : दुष्काळ तसा जीवघेणाच असतो, परंतु हाच दुष्काळ मजुरांच्या हाताला काम अन् भविष्यातील जलसंधारणाला बळकटी देण्यासाठी पावणारा ठरावा, या दिशेने शासनाने पावले उचलली आहेत. रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने पाच विहिरींचे कामे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात नऊ हजार विहिरींची कामे सुरु होणार असल्याने जिल्ह्यात जलसंधारणच्या कामांना बळकटी मिळणार आहे.या निर्णयानुसार सध्या स्थितीत नव्या व जुन्या मिळून जिल्ह्यात ७८० विहिरींची कामे पूर्णत्वास आली आहेत. मागासवर्गीय व छोट्या शेतकऱ्यांना शासनामार्फत विहीर खोदकामासाठी अनुदान दिले जाते, मात्र यातील गैरप्रकार वाढल्याने २०१४ पासून रोहयोतून या विहिरी केल्या जात आहेत. यात तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे ही योजना ऐन दुष्काळात लोकप्रिय होऊन उदंड प्रतिसाद मिळत आहे. या निर्णयानुसार सोयगाव तालुक्यात मागील वर्षीच्या अपूर्ण असलेल्या ११२ विहिरींची काम तातडीने हाती घेण्यात येऊन दुष्काळातही विहिरींच्या विक्रम संचिका प्राप्त होत असल्याची माहिती गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांनी दिली.दरम्यान, शासनाने ऐन दुष्काळात अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना हाती घेऊन जुन्या व नव्या योजनेतील उद्दिष्टात जिल्ह्याच्या विहिरींची प्रशासकीय मान्यता अडकली होती. सोयगाव तालुक्यात अडकलेल्या मान्यता मिळवून घेण्यासाठी गटविकास अधिकारी राठोड यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या विहिरींची कामे हाती घेतली आहे.सोयगाव तालुक्यात ४३५ विहिरींना मान्यताशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे दुष्काळात मजुरांना रोजगार आणि पावसाळ्यात या नवीन विहिरींना पाणी मिळून शेतीला मुबलक पाणी मिळेल. सोयगाव तालुक्यात ४३५ नवीन विहिरींना मान्यता मिळाली असून, कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांनी दिल्या आहेत. यासाठी एक कोटी आठ लाख ८१ हजारांच्या निधीची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात ऐन दुष्काळात जुन्या व नव्या मिळून सहाशेच्या वर नवीन विहिरी होणार आहेत.कोटसोयगाव तालुक्यात ऐन दुष्काळात मजुरांच्या हातांना कामे मिळावी, यासाठी सर्वच योजना गतिमान करून राबविण्यात येत आहेत. पहिले प्राधान्य विहिरींना देण्यात येऊन नुकतीच ग्रामसेवकांची बैठक घेऊन या कामांना गती मिळवून देण्याचे काम हाती घेतले आहे.-एम.सी राठोड, गटविकास अधिकारी, सोयगावतालुकानिहाय विहिरींची संख्याऔरंगाबाद ४१२गंगापूर १३९१कन्नड ५५९पैठण ६५फुलंब्री १३७९सिल्लोड १०५५सोयगाव ४३५वैजापूर १५२१

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीgovernment schemeसरकारी योजना