शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी पुलाला धडकल्याने जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू, औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील शिवना नदीवर झाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 18:29 IST

मोटारसायकल पुलाच्या कठड्याला धडकून त्यावरील दोन तरुण नदीपात्रात पडल्याने जागीच ठार झाले.

ठळक मुद्देअपघातानंतर टापरगावजवळील शिवना नदीपात्रात पडलेदोघेही माळीवाडा येथील रहिवासी असून जिवलग मित्र होते

हतनूर ( औरंगाबाद) : मोटारसायकल पुलाच्या कठड्याला धडकून त्यावरील दोन तरुण नदीपात्रात पडल्याने जागीच ठार झाले. हि घटना औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील टापरगावच्या शिवना नदीवरील पुलावर आज पहाटे घडली. 

प्रकाश विठ्ठल बर्डे (२३) व श्याम किसन भगत (२२, रा. माळीवाडा, दौलताबाद) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मित्र एम.एच. २० -सीपी-७८४८ या क्रमांकाच्या मोटारसायकलने कन्नडहून औरंगाबादकडे पहाटे तीनच्या सुमारास जात असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व पुलाच्या कठड्याला धडकून दोघेही पुलाखाली नदीपात्रात पडून जागीच गतप्राण झाले. शिवना नदीपात्रात पाणी नसल्याने दोन्ही तरुणांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी ७ वाजता नजरेस पडले. घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस घटनास्थळी  दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक रोहित बेंबरे यांनी दोघांचे मृतदेह हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविले. पुढील तपास बेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जयंत सोनवणे हे करीत आहेत.

माळीवाडा येथे अंत्यसंस्कार

दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी माळीवाडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश व श्याम जीवलग मित्र होते. दोघेही सोबत राहायचे. काल ते कन्नडला मित्राला भेटण्यासाठीच गेले होते. परतताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. आज दिवसभर माळीवाडा कडकडीत बंद ठेऊन गावक-यांनी मयत दोन्ही तरुणांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रकाश हा आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील मिस्तरी काम करतात. मयत प्रकाशच्या पश्चात आई-वडील व एक बहिण असून श्यामच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे. दोन्ही तरुणांची घरची परिस्थिती साधारण आहे. प्रकाश हा मामाच्या मोबाईल शॉपीमध्ये माळीवाडा येथेच काम करायचा. श्याम हा वाळूज महानगरातील एका कंपनीत काम करायचा. त्यांच्या अपघाती मृत्यूने माळीवाड्यावर शोककळा पसरली आहे.