शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून मनभेद मैदानात

By admin | Updated: September 29, 2014 00:45 IST

नजीर शेख, औरंगाबाद एकेकाळी गुलमंडीवर आपल्या मैत्रीची ग्वाही देणारे आणि वर्तमानपत्रांना त्यासंबंधीच्या मुलाखती देणारे मात्र मागील दीड-दोन वर्षांत एकमेकांचे राजकीय वैरी झाले

नजीर शेख, औरंगाबादएकेकाळी गुलमंडीवर आपल्या मैत्रीची ग्वाही देणारे आणि वर्तमानपत्रांना त्यासंबंधीच्या मुलाखती देणारे मात्र मागील दीड-दोन वर्षांत एकमेकांचे राजकीय वैरी झालेले आ. प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी हे एकदाचे एकमेकांसमोर उभे ठाकलेच. युती तुटली आणि तनवाणी यांनी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आ. जैस्वाल यांच्या विरोधात तनवाणी भूमिका घेण्याची संधी साधली. गुलमंडीवर राहणाऱ्या या दोन नेत्यांचे तसे पाहता कार्यक्षेत्रदेखील एकच राहिले. चंद्रकांत खैरे आमदार झाल्यानंतर आ. जैस्वाल यांनी गुलमंडीवर आपले वर्चस्व निर्माण केले. त्याचवेळी किशनचंद तनवाणी हे त्यांच्या बरोबरीने राहिले. जैस्वाल खासदार झाल्यानंतरच्या खूप वेळानंतर म्हणजे २००४-०५ या काळात तनवाणी यांनी महापौरपद भूषविले. २००४ साली औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जैस्वाल यांचा पराभव झाल्यानंतर तनवाणी यांना आमदार होण्याचे वेध लागले. त्यांची ही इच्छा पक्षाने औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उमेदवारी देऊन पूर्णही केली. मात्र, अशा मतदारसंघातून थेट जनतेशी संबंध येत नसल्याने तनवाणी यांना त्यात फारसा रस नव्हता. विधानसभेचा आमदार होण्याची त्यांची मनीषा कायम राहिली. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यावेळी तनवाणी विधान परिषदेचे आमदार असल्याने विकास जैन यांना उमेदवारी मिळाली. जैस्वाल हे अपक्ष उभे राहून निवडून आले. त्यानंतर जैस्वाल हे पुन्हा स्वगृही परतले होते. याच काळात जैस्वाल आणि तनवाणी यांचे संबंध अधिक बिघडले.विधान परिषदेच्या २०१३ साली झालेल्या निवडणुकीत तनवाणी यांचा पराभव झाला. हा पराभव स्पष्ट दिसत असतानाही पक्षाच्या दबावापुढे त्यांचा नाइलाज झाला होता. पराभूत उमेदवाराची मानसिकता घेऊन तनवाणी काही दिवसांपासून वावरत असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे राजकारणात टिकून राहणे ही तनवाणी यांची गरज बनली असताना जैस्वाल हे त्यामधील अडथळा ठरत असल्याचा तनवाणी यांचा समज आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार दोन हजार मतांनी पिछाडीवर राहिल्यानंतर तर तनवाणी यांची आमदार होण्याची तीव्र इच्छा उफाळून आली. जैस्वाल यांना कदाचित विधानसभेचे तिकीट मिळणार नाही, असा अंदाज तनवाणी बांधत होते.मात्र, जैस्वाल यांनाच तिकीट जाहीर झाल्याने तनवाणी यांचा पुरता बीमोड झाला. निवडणुकीची त्यांनी मोठी तयारी केली होती. प्रसंगी अपक्ष उभे राहण्याचीही त्यांची तयारी होती. तनवाणी यांना राजकीय अस्तित्वासाठी युती तुटल्याने आता भाजपाचा आधार मिळाला आहे. या काळात दोघांमध्ये कुठेही जाहीर वाद किंवा टीकाटिप्पणी झाली नसली तरी अंतर्गत धुसफूस चालूच होती. तनवाणी आणि जैस्वाल यांचे संबंध बिघडण्यामागे व्यावसायिक किंवा इतर काही कारणे आहेत का, याचा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात असला तरी हे कारण राजकीयच असल्याचे गुलमंडी परिसरात बोलले जाते. दोघे मित्र आता राजकारणाच्या मैदानात एकमेकांना मात देण्याच्या प्रयत्नात आहेत.