शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून मनभेद मैदानात

By admin | Updated: September 29, 2014 00:45 IST

नजीर शेख, औरंगाबाद एकेकाळी गुलमंडीवर आपल्या मैत्रीची ग्वाही देणारे आणि वर्तमानपत्रांना त्यासंबंधीच्या मुलाखती देणारे मात्र मागील दीड-दोन वर्षांत एकमेकांचे राजकीय वैरी झाले

नजीर शेख, औरंगाबादएकेकाळी गुलमंडीवर आपल्या मैत्रीची ग्वाही देणारे आणि वर्तमानपत्रांना त्यासंबंधीच्या मुलाखती देणारे मात्र मागील दीड-दोन वर्षांत एकमेकांचे राजकीय वैरी झालेले आ. प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी हे एकदाचे एकमेकांसमोर उभे ठाकलेच. युती तुटली आणि तनवाणी यांनी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आ. जैस्वाल यांच्या विरोधात तनवाणी भूमिका घेण्याची संधी साधली. गुलमंडीवर राहणाऱ्या या दोन नेत्यांचे तसे पाहता कार्यक्षेत्रदेखील एकच राहिले. चंद्रकांत खैरे आमदार झाल्यानंतर आ. जैस्वाल यांनी गुलमंडीवर आपले वर्चस्व निर्माण केले. त्याचवेळी किशनचंद तनवाणी हे त्यांच्या बरोबरीने राहिले. जैस्वाल खासदार झाल्यानंतरच्या खूप वेळानंतर म्हणजे २००४-०५ या काळात तनवाणी यांनी महापौरपद भूषविले. २००४ साली औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जैस्वाल यांचा पराभव झाल्यानंतर तनवाणी यांना आमदार होण्याचे वेध लागले. त्यांची ही इच्छा पक्षाने औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उमेदवारी देऊन पूर्णही केली. मात्र, अशा मतदारसंघातून थेट जनतेशी संबंध येत नसल्याने तनवाणी यांना त्यात फारसा रस नव्हता. विधानसभेचा आमदार होण्याची त्यांची मनीषा कायम राहिली. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यावेळी तनवाणी विधान परिषदेचे आमदार असल्याने विकास जैन यांना उमेदवारी मिळाली. जैस्वाल हे अपक्ष उभे राहून निवडून आले. त्यानंतर जैस्वाल हे पुन्हा स्वगृही परतले होते. याच काळात जैस्वाल आणि तनवाणी यांचे संबंध अधिक बिघडले.विधान परिषदेच्या २०१३ साली झालेल्या निवडणुकीत तनवाणी यांचा पराभव झाला. हा पराभव स्पष्ट दिसत असतानाही पक्षाच्या दबावापुढे त्यांचा नाइलाज झाला होता. पराभूत उमेदवाराची मानसिकता घेऊन तनवाणी काही दिवसांपासून वावरत असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे राजकारणात टिकून राहणे ही तनवाणी यांची गरज बनली असताना जैस्वाल हे त्यामधील अडथळा ठरत असल्याचा तनवाणी यांचा समज आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार दोन हजार मतांनी पिछाडीवर राहिल्यानंतर तर तनवाणी यांची आमदार होण्याची तीव्र इच्छा उफाळून आली. जैस्वाल यांना कदाचित विधानसभेचे तिकीट मिळणार नाही, असा अंदाज तनवाणी बांधत होते.मात्र, जैस्वाल यांनाच तिकीट जाहीर झाल्याने तनवाणी यांचा पुरता बीमोड झाला. निवडणुकीची त्यांनी मोठी तयारी केली होती. प्रसंगी अपक्ष उभे राहण्याचीही त्यांची तयारी होती. तनवाणी यांना राजकीय अस्तित्वासाठी युती तुटल्याने आता भाजपाचा आधार मिळाला आहे. या काळात दोघांमध्ये कुठेही जाहीर वाद किंवा टीकाटिप्पणी झाली नसली तरी अंतर्गत धुसफूस चालूच होती. तनवाणी आणि जैस्वाल यांचे संबंध बिघडण्यामागे व्यावसायिक किंवा इतर काही कारणे आहेत का, याचा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात असला तरी हे कारण राजकीयच असल्याचे गुलमंडी परिसरात बोलले जाते. दोघे मित्र आता राजकारणाच्या मैदानात एकमेकांना मात देण्याच्या प्रयत्नात आहेत.