शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘दुधना’ची पाणीपातळी ‘जैसे थे’

By admin | Updated: July 21, 2014 00:27 IST

मोहन बोराडे, सेलू सेलू शहरासह जालना जिल्ह्यातील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ झाली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे़

मोहन बोराडे, सेलूसेलू शहरासह जालना जिल्ह्यातील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ झाली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे़ पावसाळयाचा दीड महिना उलटला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी निम्न दुधनाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही़ त्यामुळे आगामी काळात पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे़ गतवर्षी जालना जिल्ह्यासह सेलू परिसरात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पात ६० टक्के पाणी साठविण्यात आले़ त्यामुळे उन्हाळ्यात सेलू शहरासह जालना जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाई जाणवली नाही़ जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात तरी समाधानकारक पाऊस होईल, ही अपेक्षा होती. परंतु, २० जुलैपर्यंत मोठा पाऊस झालेला नाही़ जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होतो़ परंतु, जालना जिल्ह्यात वरूणराजाने विश्रांती घेतल्यामुळे पाणीपातळीत दखल घेण्याइतपत वाढ झालेली नाही़ त्यामुळे सद्य:स्थितीत निम्न दुधना प्रकल्पात जिवंत साठा केवळ ३० टक्के आहे़ एकूण साठा ५० टक्के असून प्रकल्पात १७५ द़ल़घ़मी़ पाणी आहे़ गतवर्षी निम्न दुधना प्रकल्पात २३० द़ल़घ़मी़ पाणीसाठा होता़ जवळपास ७५ टक्के यातील पाणी वापरण्यात आले आहे़ तर काही पाणी बाष्पीभवनाने कमी झाले आहे़ गतवर्षी दुधना प्रकल्पात मोठयाप्रमाणावर पाणीसाठा झाल्यामुळे उजव्या कालव्याची पाणी सोडून चाचणी घेण्यात आली होती़ तसेच सेलू शहरालाही दुधनाने पाणी पुरविले आहे़ परंतु, दीड महिना उलटूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रकल्पात पाण्याची वाढ झाली नसल्यामुळे आगामी काळात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे़ जालना जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी नदी, नाले कोरडे आहेत़ पावसाचे पाणी जमिनीतच आटल्यामुळे प्रकल्पात पाणी आलेले नाही़ त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ न होता उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची भिस्त आहे़ गतवर्षी प्रकल्पात चांगला पाणी साठा झाल्यामुळे यावर्षी प्रकल्प पूर्ण भरून पाण्याचा सिंचनासाठी वापर होईल, ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे़ परंतु, पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचे संकट ‘आ’ वासून उभे टाकले आहे़प्रकल्पात ३० टक्के जिवंत साठा निम्न दुधना प्रकल्पात सद्य:स्थितीत ५० टक्के पाणीसाठा असला तरी ३० टक्के जिवंत पाणीसाठा आहे़ गतवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला होता़ परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसून पाणी पातळीत वाढ झालेली नाही़ प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्यास उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सोडणे शक्य होणार नाही़ त्यामुळे प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना पाऊस झाल्याशिवाय होणार नाही़ त्यामुळे जालना जिल्ह्यासह सेलू तालुक्यात वरूणराजाने बरसावे, हीच अपेक्षा सर्वांची आहे़