शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

डी.टी.एड.परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: June 10, 2014 00:56 IST

शेषराव वायाळ , परतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी डीटीएड (शिक्षक पदविका अभ्यासक्रम) परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे.

शेषराव वायाळ , परतूरतालुक्यातील विद्यार्थ्यांनी डीटीएड (शिक्षक पदविका अभ्यासक्रम) परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. प्रथम वर्षाच्या १७५ पैकी २८ तर द्वितीय वर्षाचे २३२ पैकी १४ परीक्षार्थी सोमवारी सुरू झालेल्या परीक्षेस गैरहजर होते. दरम्यान, अध्यापक विद्यालयांवरही आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.एकेकाळी डी. एड. अभ्यासक्रमास मोठे महत्त्व होते. अध्यापक विद्यालयाची पदवी मिळवली की, हमखास नोकरीची हमी असायची. झटपट शिक्षण झटपट नोकरी, अशी व्याख्या झाली होती. त्यामुळे डी.एड.साठी लाखो रूपये मोजून मोठे लोंढे वाढले होते; परंतु आता मागील सात ते आठ वर्षांत या डीएडधारकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याने विद्यार्थ्यांचा ओढा कमी होण्याबरोबरच अध्यापक विद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहेत. डोनेशन तर सोडाच केवळ फिसवरही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. पूर्वी बारावी झाली की विद्यार्थी डीएडकडे हमखास वळत.जिल्ह्यासोबतच राज्यभरातील अनेक डीएड महाविद्यालयांत अर्ज भरण्यासाठी रांगा लागत. विशेष गाड्या करुन विद्यार्थ्यांची गर्दी होत असे. मात्र डीएड करुनही नोकरीची हमी राहिली नसल्याने विद्यार्थी डीएडकडे आता कानाडोळा करीत आहेत. लाखो रुपयांचे डोनेशन देऊन प्रवेशासाठी उड्या पडायच्या. ही परिस्थिती अचानक बदलली आहे. या परिस्थितीमुळे अध्यापक विद्यालयांची परिस्थितीही हलाखीची बनली आहे. दि. ९ रोजी या डी.टी.एड. परीक्षेस प्रारंभ झाला. शहरातील स्वामी विवेकांनद विद्यालयात ही परीक्षा सुरू आहे.मंठा तालुक्यातील दोन व परतूर तालुक्यातील दोन अशा चार अध्यापक विद्यालयातील प्रथम वर्षातील एकूण १७५ तर द्वितिय वर्षातील २३२ छात्र अध्यापक परीक्षेस बसले होते. मात्र आज प्रत्यक्षात प्रथम वर्षाचे २८ व द्वितीय वर्षाचे १४ परीक्षार्थी गैरहजर दिसून आले.पुढचे भवितव्य अधांतरी असल्याने या परीक्षेतही विद्यार्थ्यांना रस उरला नाही. प्रथम व द्वितीय वर्षाचे मिळून ४२ जण परीक्षेसाठी आलेच नाहीत. एकेकाळी डी.एड.च्या प्रवेशासाठी पराकोटीची स्पर्धा होती; परंतु आज ही स्पर्धा लयास जावून अध्यापक विद्यालये सलाईनवर आहेत. परतूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावातील अध्यापक विद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहेत. विद्यार्थी नसल्याने ही महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत. शासनाने काही उपाययोजना करावी, अशी मागणी काही संस्थाचालक तसेच शिक्षकांतून ऐकावयास मिळते. पूर्व परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थी संख्या वाढू शकते, असा सूर काही जण व्यक्त करीत आहेत.