शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डी.टी.एड.परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: June 10, 2014 00:56 IST

शेषराव वायाळ , परतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी डीटीएड (शिक्षक पदविका अभ्यासक्रम) परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे.

शेषराव वायाळ , परतूरतालुक्यातील विद्यार्थ्यांनी डीटीएड (शिक्षक पदविका अभ्यासक्रम) परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. प्रथम वर्षाच्या १७५ पैकी २८ तर द्वितीय वर्षाचे २३२ पैकी १४ परीक्षार्थी सोमवारी सुरू झालेल्या परीक्षेस गैरहजर होते. दरम्यान, अध्यापक विद्यालयांवरही आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.एकेकाळी डी. एड. अभ्यासक्रमास मोठे महत्त्व होते. अध्यापक विद्यालयाची पदवी मिळवली की, हमखास नोकरीची हमी असायची. झटपट शिक्षण झटपट नोकरी, अशी व्याख्या झाली होती. त्यामुळे डी.एड.साठी लाखो रूपये मोजून मोठे लोंढे वाढले होते; परंतु आता मागील सात ते आठ वर्षांत या डीएडधारकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याने विद्यार्थ्यांचा ओढा कमी होण्याबरोबरच अध्यापक विद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहेत. डोनेशन तर सोडाच केवळ फिसवरही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. पूर्वी बारावी झाली की विद्यार्थी डीएडकडे हमखास वळत.जिल्ह्यासोबतच राज्यभरातील अनेक डीएड महाविद्यालयांत अर्ज भरण्यासाठी रांगा लागत. विशेष गाड्या करुन विद्यार्थ्यांची गर्दी होत असे. मात्र डीएड करुनही नोकरीची हमी राहिली नसल्याने विद्यार्थी डीएडकडे आता कानाडोळा करीत आहेत. लाखो रुपयांचे डोनेशन देऊन प्रवेशासाठी उड्या पडायच्या. ही परिस्थिती अचानक बदलली आहे. या परिस्थितीमुळे अध्यापक विद्यालयांची परिस्थितीही हलाखीची बनली आहे. दि. ९ रोजी या डी.टी.एड. परीक्षेस प्रारंभ झाला. शहरातील स्वामी विवेकांनद विद्यालयात ही परीक्षा सुरू आहे.मंठा तालुक्यातील दोन व परतूर तालुक्यातील दोन अशा चार अध्यापक विद्यालयातील प्रथम वर्षातील एकूण १७५ तर द्वितिय वर्षातील २३२ छात्र अध्यापक परीक्षेस बसले होते. मात्र आज प्रत्यक्षात प्रथम वर्षाचे २८ व द्वितीय वर्षाचे १४ परीक्षार्थी गैरहजर दिसून आले.पुढचे भवितव्य अधांतरी असल्याने या परीक्षेतही विद्यार्थ्यांना रस उरला नाही. प्रथम व द्वितीय वर्षाचे मिळून ४२ जण परीक्षेसाठी आलेच नाहीत. एकेकाळी डी.एड.च्या प्रवेशासाठी पराकोटीची स्पर्धा होती; परंतु आज ही स्पर्धा लयास जावून अध्यापक विद्यालये सलाईनवर आहेत. परतूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावातील अध्यापक विद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहेत. विद्यार्थी नसल्याने ही महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत. शासनाने काही उपाययोजना करावी, अशी मागणी काही संस्थाचालक तसेच शिक्षकांतून ऐकावयास मिळते. पूर्व परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थी संख्या वाढू शकते, असा सूर काही जण व्यक्त करीत आहेत.