शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाळूपट्ट्यांचा ठेका; प्रशासन घामाघूम

By admin | Updated: June 2, 2015 00:31 IST

औरंगाबाद : वाळूपट्ट्यांचा लिलाव होत नसल्यामुळे वाळूची चोरटी वाहतूक व उपसा थांबविण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.

औरंगाबाद : वाळूपट्ट्यांचा लिलाव होत नसल्यामुळे वाळूची चोरटी वाहतूक व उपसा थांबविण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. चौथ्यांदा वाळूपट्ट्यांचा लिलाव करूनही फक्त एकाच पट्ट्याचा लिलाव झाला आहे. प्रशासनाच्या लिलाव प्रक्रियेची यंदाच्या हंगामात पूर्णत: थट्टा झाली आहे. आता पावसाळ्यानंतर नव्याने प्रक्रिया करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. वाळूपट्ट्यांच्या वाढलेल्या किमती, सरकारचे नियम आणि प्रशासनाकडून होणाऱ्या त्रासामुळे वैतागलेल्या ठेकेदारांनी अधिकृतपणे पट्टा घेण्यापेक्षा अनधिकृत उपसा करून वाळू विकण्यात स्वारस्य ठेवले आहे. परिणामी वाळूचा उपसा होऊनही प्रशासनाचा महसूल बुडाला आहे. जिल्ह्यातील ६ वाळूपट्ट्यांचे लिलाव झाले आहेत. ठेकेदार प्रतिसाद देत नसल्यामुळे रॉयल्टीची २५ टक्के रक्कम कमी करून प्रशासनाने चौथ्यांदा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ३१ आणि संयुक्त ४ वाळूपट्ट्यांचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली. फेबु्रवारीत जिल्ह्यातील ९ व संयुक्त १, अशा १० वाळूपट्ट्यांचा लिलाव झाला. ९ पैकी ३ ठेकेदारांनी २५ टक्के रक्कम न भरल्यामुळे ३ पट्ट्यांचे ठेके रद्द केले. मागील तीन महिन्यांत ३२ वाळूपट्ट्यांचे ४ वेळा आॅनलाईन लिलाव करण्यात आले. नियम व किचकट प्रक्रियेमुळे परिणामी प्रशासनाच्या लिलाव प्रक्रियेला ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही. वाळू ठेक्यांमुळे प्रशासनाला दरवर्षी लाखों रुपयांचा महसूल मिळतो. ३५ वाळूपट्ट्यांची किंमत ६ कोटी ६ लाख रुपये ठेवण्यात आली होती. यातील गंगापूर भागातील एक पट्ट्याचा लिलाव झाला. उर्वरित पट्टे आता पावसाळ्यानंतरच लिलाव प्रक्रियेत येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. १ सप्टेंबर ते ३१ आॅगस्ट, असे वाळूपट्ट्यांच्या लिलावाचे वर्ष आहे. एवढ्या काळात पट्टे लिलाव करून दिले जातात. आता तीन महिन्यांसाठी ठेकेदार येणार नाहीत. त्यामुळे लिलाव पावसाळ्यानंतरच होतील, असे दिसते. संयुक्त वाळूपट्टे असलेल्या आवडे उंचेगाव, गुंतेगाव, पाथरवाला आणि आपेगाव, कुरणपिंप्री या पट्ट्यांचे लिलाव होणार होते. चोरटी वाहतूक करणारे मोकाट आणि ठेका घेणारे तुरुंगात जात आहेत. ४नियमाने ठेका घेऊनही ठेकेदारांवर गुन्हे दाखल होत आहेत. तर बेकायदा वाळू उपसून विक्री करणाऱ्यांना एकच कलम लावून त्यांना पुन्हा सोडून देण्यात पोलीस धन्यता मानतात. ४हप्ते देऊन चोरटी वाहतूक करणे सोपे झाले. मात्र, अधिकृत ठेकेदारी करणाऱ्यांभोवती अनेक कलमांचा फास आवळला जातो. त्यामुळे प्रशासनाच्या लिलाव प्रक्रि येला ठेकेदारांनी ठेंगा दाखविला.