शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

पाणीटंचाईमुळे माठही कोरडे

By admin | Updated: April 4, 2016 00:40 IST

अहमदपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्यासाठी घागरभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरु आहे़ सध्या तीव्र उन्हाळा असतानाही यंदा थंड पाणी मिळावे म्हणून

अहमदपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्यासाठी घागरभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरु आहे़ सध्या तीव्र उन्हाळा असतानाही यंदा थंड पाणी मिळावे म्हणून माठ खरेदीकडे सर्वसामान्य धजावत नाहीत़ कारण माठातील पाणी जिरपते आणि यंदा तर पिण्यासाठी विकतचे घ्यावे लागत असल्याने हे परवडेनासे झाले आहे़उन्हाची चाहूल लागली की, गोरगरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांना मोठी मागणी असते़ माठातील पाणी पिल्यानंतर तहान शमते़ परंतु, यंदा दुष्काळामुळे पिण्यासही पाणी मिळेनासे झाले आहे़ उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे़ त्यामुळे जलस्त्रोत आटत आहेत़ अहमदपूर शहराला तर सध्या जवळपास २५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे़ त्यामुळे नळाला आलेले पाण्याचा काटकसरीने वापर सुरु आहे़ शहरातील सर्व भागांना नळाचे पाणी येत नाही़ त्यातही २५ दिवसांतून एकदा आलेले पाणी पुरेसे ठरत नाही़ त्यामुळे नळाच्या पाण्याचा सुरुवातीचे चार दिवस पिण्यासाठी उपयोग करुन त्यानंतर विकतच्या पाण्यावर तहान भागविली जात आहे़ विकतच्या पाण्यास मागणी वाढल्याने विक्रेत्यांनीही आपले दर वाढविले आहेत़ त्यामुळे एका जारला सध्या जवळपास ३० रुपये मोजावे लागतात़ जारचे पाणी केवळ पिण्यासाठी अत्यंत काटकसरीने वापरले जात आहे़माठातील पाणी जिरपते़ त्यामुळे जारचे पाणी माठात टाकल्यानंतर कमी होते़ परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना माठातील पाणी पिणे परवडेनासे झाले आहे़ त्यापेक्षा ठराविक रक्कम अनामत ठेऊन नवीन पध्दतीच्या प्लास्टिकच्या जारचे सीलबंद पाणी मिळत आहे़ या प्लास्टिकच्या जारमधील पाणी दिवसातील काही तास थंड रहाते़ त्यामुळे ते सध्या सर्वांना परवडणारे वाटत आहे़ परिणामी, याच जारचा उपयोग केला जात आहे़ त्यामुळे माठांना मागणी कमी झाली आहे़