शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

अस्वस्थतेतून ‘औषध’ लघुपटाची निर्मिती

By admin | Updated: June 29, 2017 00:14 IST

परभणी : ग्राहकांचे चेहरे वाचता वाचता जी अस्वस्थता वाटायला लागली, त्यातूनच ‘औषध’ या लघुपटाची निर्मिती झाली़, असे मत अमोल देशमुख यांनी व्यक्त केले़

त्र्यंबक वडसकर । लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सामाजिक व्यवस्था, कौटुंबिक व्यवस्था व आपले अज्ञान यातून अस्वस्थता जाणवत होती़ माझ्या फार्मसी व्यवसायात येणाऱ्या ग्राहकांचे चेहरे वाचता वाचता जी अस्वस्थता वाटायला लागली, त्यातूनच ‘औषध’ या लघुपटाची निर्मिती झाली़, असे मत अमोल देशमुख यांनी व्यक्त केले़ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘औषध’ या लघुपटाचे दिग्दर्शक अमोल देशमुख हे परभणी येथे ‘चित्रपट रसास्वाद’ या कार्यक्रमासाठी आले असता, ‘लोकमत’शी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या़ ‘औषध’ या लघुपटाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, एका म्हातारीला चुकीच्या गोळ्या दिल्या गेल्या, ही गोष्ट रात्री उशिरा लक्षात आल्यानंतर त्या म्हातारीच्या घराचा शोध घेत मानवी नातेसंबंधावर प्रकाश टाकत औषधी क्षेत्रातील जबाबदारी या लघुपटातून ठळक केली आहे़ या क्षेत्राकडे कसे वळलात? असे विचारले असता, त्यांनी सांगितले, लहानपणापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमाची व नाटक करण्याची आवड होती़ पुढे फार्मसीच्या व्यवसायात स्थिर झाल्यानंतर माझ्यातील कलावंत शांत बसू देत नव्हता़ त्यातून आरबाड फिल्म क्लब पुणे यांच्या पहिल्या वर्कशॉपचा मी पहिला विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण घेतले़ प्रसिद्ध दिग्दर्शक समर नखाते, उमेश कुलकर्णी व संकलन रिमा कौर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन या क्षेत्रात पदार्पण केले़ या १५ वर्षात डिजीटल क्रांती झाली असून, पूर्वी शहरातच असलेला कॅमेरा आता घराघरात जावून पोहचला आहे़ ग्रामीण भागातील लोकांची अनुभव संपन्नता खूप मोठी आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी घाई न करता अगोदर तांत्रिक प्रशिक्षण घेऊनच यावे, असेही देशमुख यांनी सांगितले़