शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

दुष्काळ पाहणीचा पुन्हा फक्त फार्स!

By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८५२२ गावांत दुष्काळ असल्याचे जाहीर होऊन महिना उलटला आहे. विभागात खरीप हंगामाचे पावसाअभावी वाटोळे झाले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८५२२ गावांत दुष्काळ असल्याचे जाहीर होऊन महिना उलटला आहे. विभागात खरीप हंगामाचे पावसाअभावी वाटोळे झाले आहे. रबी हंगामातही विशेष असा फायदा होईल, अशी शक्यता नाही. ३ हजार कोटी रुपयांची गरज खरीप हंगाम वाया गेलेल्या शेतकऱ्यांना करावी लागणार आहे, अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्तालयाला दौऱ्याचा तपशील प्राप्त होणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्रसिंग, केंद्रीय फलोत्पादन महामंडळाचे कार्यकारी संचालक ए. के. सिंग, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी १० ते १२ आॅगस्ट रोजी पाहणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा पाहणीचा फार्स होण्याचा आरोप शेतकरीवर्गातून सुरू झाला आहे. तीन वर्षांपासून दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पथके येत आहेत; परंतु शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात आलेली नाही. जी मदत जाहीर केली जाते, त्यातून शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नाही. देण्यात आलेल्या मदतीच्या दुप्पट खर्च खरीप हंगामात करावा लागतो. महागाई निर्देशांकानुसार मदत देण्याचा विचार शासनाने करावा, अशी मागणी वारंवार होत आहे. तीन वर्षांपासून हंगामात केंद्र, राज्य समितीसह राजकीय पुढाऱ्यांचे दौरे आयोजित होतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे सांत्वन, जळालेल्या बागा, वाया गेलेली पिके पाहणे यासाठी प्रशासन आणि राजकारण्यांमध्ये चढाओढ सुरू होते; परंतु ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस मराठवाड्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.आॅगस्टमध्ये केलेल्या दुष्काळ पाहणीचा अहवाल केंद्र व राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासनाने त्या अहवालाबाबत निर्णय जाहीर करण्यापूर्वीच पुन्हा दुसऱ्यांदा दुष्काळग्रस्त मराठवाड्याची पाहणी करण्यात येणार आहे.