शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
4
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
5
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
6
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
7
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
8
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
9
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
10
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
11
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
12
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
13
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
14
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
15
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
16
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
17
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
18
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
19
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
20
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट

दुष्काळ पाहणीचा पुन्हा फक्त फार्स!

By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८५२२ गावांत दुष्काळ असल्याचे जाहीर होऊन महिना उलटला आहे. विभागात खरीप हंगामाचे पावसाअभावी वाटोळे झाले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८५२२ गावांत दुष्काळ असल्याचे जाहीर होऊन महिना उलटला आहे. विभागात खरीप हंगामाचे पावसाअभावी वाटोळे झाले आहे. रबी हंगामातही विशेष असा फायदा होईल, अशी शक्यता नाही. ३ हजार कोटी रुपयांची गरज खरीप हंगाम वाया गेलेल्या शेतकऱ्यांना करावी लागणार आहे, अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्तालयाला दौऱ्याचा तपशील प्राप्त होणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्रसिंग, केंद्रीय फलोत्पादन महामंडळाचे कार्यकारी संचालक ए. के. सिंग, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी १० ते १२ आॅगस्ट रोजी पाहणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा पाहणीचा फार्स होण्याचा आरोप शेतकरीवर्गातून सुरू झाला आहे. तीन वर्षांपासून दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पथके येत आहेत; परंतु शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात आलेली नाही. जी मदत जाहीर केली जाते, त्यातून शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नाही. देण्यात आलेल्या मदतीच्या दुप्पट खर्च खरीप हंगामात करावा लागतो. महागाई निर्देशांकानुसार मदत देण्याचा विचार शासनाने करावा, अशी मागणी वारंवार होत आहे. तीन वर्षांपासून हंगामात केंद्र, राज्य समितीसह राजकीय पुढाऱ्यांचे दौरे आयोजित होतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे सांत्वन, जळालेल्या बागा, वाया गेलेली पिके पाहणे यासाठी प्रशासन आणि राजकारण्यांमध्ये चढाओढ सुरू होते; परंतु ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस मराठवाड्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.आॅगस्टमध्ये केलेल्या दुष्काळ पाहणीचा अहवाल केंद्र व राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासनाने त्या अहवालाबाबत निर्णय जाहीर करण्यापूर्वीच पुन्हा दुसऱ्यांदा दुष्काळग्रस्त मराठवाड्याची पाहणी करण्यात येणार आहे.