शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट...!

By admin | Updated: July 9, 2017 00:34 IST

जालना : जिल्ह्यात पावसाचा तब्बल वीस दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पावसाचा तब्बल वीस दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पेरणी धोक्यात आली आहे. परिणामी गत वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे दुष्काळातून सावरत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा दुष्काळ पडला तर, या विचाराने घालमेल सुरू आहे.जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टवर खरीप पेरणीचे नियोजन आहे. पैकी सात जुलैअखेर तीन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीची सरासरीच्या १.९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापसाच्या २९७९.९२ पैकी २३०४.६४ हेक्टरक्षेत्रावर लागवड झाली आहे. कापूस पिकाची उगवण चांगली झाली असून, पीक तीन ते चार पानावर वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकात आंतर मशागत कोळपणी, खुरपणीची कामे पूर्ण झाली आहे. खताची पहिली मात्रा देण्यात आली असून, कीटकनाशक फवारणी सुरू आहे. परंतु आता पावसाअभावी कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. तुरीच्या ४८७.०७ हेक्टर क्षेत्रापैकी ४०७.५ हेक्टवर पेरणी झाली आहे. उडीद व मूग पिकाची अनुक्रमे ४६.३ व ६७.३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. वाढीच्या अवस्थेत असलेल्या या पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बाजरी व मका पिकांची अनुक्रमे २१२.०१ व ३४३.०८ हेक्टवर पेरणी झाली आहे. वाढीच्या अवस्थेत पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची सर्वच पिके धोक्यात आली आहेत. खरिप पिकांसाठी पावसाची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने विभागीय स्तरावर पाठवला आहे. सर्वांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.