शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट...!

By admin | Updated: July 9, 2017 00:34 IST

जालना : जिल्ह्यात पावसाचा तब्बल वीस दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पावसाचा तब्बल वीस दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पेरणी धोक्यात आली आहे. परिणामी गत वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे दुष्काळातून सावरत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा दुष्काळ पडला तर, या विचाराने घालमेल सुरू आहे.जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टवर खरीप पेरणीचे नियोजन आहे. पैकी सात जुलैअखेर तीन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीची सरासरीच्या १.९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापसाच्या २९७९.९२ पैकी २३०४.६४ हेक्टरक्षेत्रावर लागवड झाली आहे. कापूस पिकाची उगवण चांगली झाली असून, पीक तीन ते चार पानावर वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकात आंतर मशागत कोळपणी, खुरपणीची कामे पूर्ण झाली आहे. खताची पहिली मात्रा देण्यात आली असून, कीटकनाशक फवारणी सुरू आहे. परंतु आता पावसाअभावी कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. तुरीच्या ४८७.०७ हेक्टर क्षेत्रापैकी ४०७.५ हेक्टवर पेरणी झाली आहे. उडीद व मूग पिकाची अनुक्रमे ४६.३ व ६७.३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. वाढीच्या अवस्थेत असलेल्या या पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बाजरी व मका पिकांची अनुक्रमे २१२.०१ व ३४३.०८ हेक्टवर पेरणी झाली आहे. वाढीच्या अवस्थेत पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची सर्वच पिके धोक्यात आली आहेत. खरिप पिकांसाठी पावसाची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने विभागीय स्तरावर पाठवला आहे. सर्वांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.