शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

धान्यटंचाई संपली

By admin | Updated: May 28, 2014 00:26 IST

उस्मानाबाद : कोणही उपाशीपोटी राहू नये, या उद्देशाने अन्नसुरक्षा योजना सुरू करण्यात आली. या योजनेला जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला.

उस्मानाबाद : कोणही उपाशीपोटी राहू नये, या उद्देशाने अन्नसुरक्षा योजना सुरू करण्यात आली. या योजनेला जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासाही मिळाला. परंतु, या योजनेत समावेश होऊ न शकलेल्या सुमारे १ लाखावर शिधापत्रिकाधारकांसाठीचे धान्य रेशन दुकानांमध्ये दोन महिन्या पासून धान्य उपलब्ध झाले नव्हते. मात्र, मे महिन्यात तांदूळा बरोबर गहू प्रशासनाला प्राप्त झाल्याने एपीलधारकांची धान्य टंचाई आता संपली आहे. जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेची अमंलबजावणी १ फेब्रुवारीपासून सुरु झाली. जिल्ह्यातील ११ लाख ७७ हजार लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. यांच्यासाठी प्रतिमहा ८२१९.४८५ मेट्रिक टन इतके धान्य लागते. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना २ रुपये किलो प्रमाणे गहू, ३ रुपयांप्रमाणे तांदूळ तर १ रूपयांप्रमाणे भरडधान्य वितरित केले जात आहे. मात्र एपीएल धारकांना गेल्या दोन महिन्यापासून राज्य शासनाकडून धान्य पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ८८६ लाभार्थी शिधापत्रिका धारकांना धान्याची टंचाई जाणवत होती. या लाभार्थ्यांना जवळपास तीन महिन्यापासून रेशनचे धान्य मिळू शकलेले नाही. त्यामुळे त्यांना महागडे अन्नधान्य खरेदी करावे लागत आहे. दरम्यान, शासनाने आता २९ हजार ८१० मे.टन तांदूळ खरेदी करुन तो एपीएल शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानावरुन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याने, सद्या ९ रूपये ६० पैसे प्रती किलो याप्रमाणे प्रति कार्ड ५ किलो या प्रमाणे याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच ७ रुपये २० पैसे प्रती किलो याप्रमाणे प्रति कार्ड १० किलो गहू देण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी) अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधाकांची संख्याही १ लाख १६ हजार ८८६ इतकी आहे. तर सदस्य संख्या ४ लाख ३९ हजार १५६ इतकी आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील १ लाख २३ हजार ४०९, तुळजापूर ८६ हजार ५३८, उमरगा ७५ हजार ५२४, लोहारा २३ हजार २२०, भूम २९ हजार ४०, परंडा ३१ हजार २७८ , कळंब ५२ हजार २५५ आणि वाशी तालुक्यात १७ हजार ८९२ सदस्यांचा समावेश आहे. गोदाम निहाय लाभार्थी (धान्य क्विंटल) गोदामाचे नावकार्डसंख्यागहूतांदूळ उस्मानाबाद१७५६११२०५८७५ तेर४०२८२७६२०१ ढोकी५२२६३५९२६१ बेंबळी३५००२४०१७४ तुळजापूर१०७५०७३८५३६ नळदूर्ग७२६७४९९३६२ उमरगा२१२८११४६०१०६१ मुरुम७४२९५१०२४६ लोहारा५०७८३४८२५३ कळंब३३१७२२८१६५ येरमाळा२५५९१७५१२८ शिराढोण२५१८१७३१२६ भूम८१४५५५९४०६ परंडा६६५१४५६३३२ अनाळा३९५२२७१२०० वाशी७६२४५२३३८० एकुण११६८८६८०२०५७०६