शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

दुष्काळी मदतीचे

By admin | Updated: September 13, 2015 00:06 IST

दत्ता थोरे ,लातूर खरिप २०१४ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीच्या एकूण २१८ कोटीच्या निधीपैकी २०७ कोटी वाटप करण्यात आले आहे़

दत्ता थोरे ,लातूर खरिप २०१४ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीच्या एकूण २१८ कोटीच्या निधीपैकी २०७ कोटी वाटप करण्यात आले आहे़ उर्वरीत १०़५३ कोटीचा निधी, सामुहिक क्षेत्रातील वाद, बँक खाते काढण्यातील अडचणी यामुळे अद्यापही रखडला आहे़ ‘लोकमत’ हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीतून हे वास्तव समोर आले आहे़ खरीप हंगाम २०१४ मध्ये बाधीत शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने २१८़२ कोटीची आर्थिक मदत जिल्हा प्रशासनाकडे १० जुलै रोजी आली़ ही मदत लातूर जिल्ह्यातील ६ लाख २१ हजार २६६़९० हेक्टरसाठी आली असून, यापैकी पहिल्या टप्प्यात १७५़७३ कोटींचे वाटप करण्यात आले़ त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४२़३० कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला़ त्यामुळे एकूण २१८ कोटींपैकी २०७़५० कोटीचा निधी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे़ परंतू, काही शेतकऱ्यांचे सामाईक क्षेत्रातील वाद, न्यायालयीन प्रकरणे, मयत शेतकरी, बाहेरगावी कामानिमित्त राहत असलेले शेतकरी यांनी बँक खातेच काढले नसल्याने उर्वरीत १०़५३ कोटींचा निधी अद्यापही जिल्हा प्रशासनाकडे पडून राहिला आहे़ जिल्हा प्रशासनाकडे राहिलेल्या निधीची माहिती शेतकऱ्याला नसल्यामुळे सदरील शेतकरी बँकेच्या शाखेकडे चकरा मारण्यात परेशान आहेत़ परंतू त्यांना बँकेच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून अपेक्षीत माहिती मिळत नसल्यामुळे आशा हजारो शेतकऱ्यांचा दुष्काळी मदत निधी अद्यापही रखडला असल्याने शेतकऱ्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ बँकेकडे चकरा मारुन थकलेल्या काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’च्या हेल्पलाईनचा आधार घेऊन तक्रारी मांडण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यामुळे लातूर जिल्ह्यातील २१८ कोटींपैकी १०़५३ कोटींचा निधी अद्यापही रखडला असल्याचे ८ शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन समोर आले आहे़ दुष्काळी मदतीपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकऱ्यांनी आपली दुष्काळी मदत आपल्यासह कुटुंबीयांना मिळावी, यासाठी दुष्काळी मदतीपासून वंचित राहिलेल्या राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाते क्रमांक देऊन आपल्या खात्यावरील दुष्काळी मदत घ्यावी, असे आवाहन नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी केले आहे़ दुष्काळी स्थितीमुळे राज्य शासनाने अन्नसुरक्षा योेजनेतून शेतकऱ्यांना दोन रुपये दराने तांदूळ आणि तीन रुपये दराने गहू देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सातबारा घेऊन शेतकरी दुकानात जात आहेत. परंतु यादीत नाव नाही म्हणून दुकानदार परत पाठवित आहेत. पर्यार्याने हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांना दुकानातून रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेप्रमाणे धान्य मिळते, तसे धान्य शेतमजुरांना का नाही ? असा सवाल शेतमजुरांमधून केला जात आहे. शेतकऱ्यांच्या घरी किमान काहीतरी असते. परंतु ज्याच्या घरी काहीच नाही ते शेतमजूर उपाशी मरत आहेत, असे औसा तालुक्यगातील सिंदाळवाडी (टेंबी) चे सय्यद गुलाम महमंद यांनी सांगितले. ४काही गावांनी शेतकऱ्यांची वाटमारी केली जात असून गरजेपेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याचे दूरध्वनी ‘लोकमत हेल्पलाईन’वर आले आहेत. त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय सातबारा दाखविल्यावर शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेप्रमाणे मिळते पण शेतमजुरांच्या धान्याबाबत शासन निर्णय घेणार आहे की नाही ? असा सवाल शेतमजुरांमधून आहे. ४‘लोकमत’ने सुरु केलेल्या हेल्पलाईनवर सर्वाधिक भ्रमणध्वनी आले ते फक्त अन्नसुरक्षेतील दरानुसार अन्न मिळत नसल्याचेच. अहमदपूर तालुक्यातील हडोळती, किनगाव, लातूर तालुक्यातील गाधवड, गंगापूर, चिंचोली बु., औसा तालुक्यातील भादा, उजनी, आशिव, किल्लारी, निलंगा तालुक्यातील निटूर, अंबुलगा, शिरुर अनंतापळसह तालुक्यातील साकोळ, उदगीर शहरसह तालुक्यातील वाढवणा बु., नागलगाव तांडा, जळकोट, देवणी, रेणापूर तालुक्यातील अनेक गावांतून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या़