शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

दुष्काळी मदतीचे

By admin | Updated: September 13, 2015 00:06 IST

दत्ता थोरे ,लातूर खरिप २०१४ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीच्या एकूण २१८ कोटीच्या निधीपैकी २०७ कोटी वाटप करण्यात आले आहे़

दत्ता थोरे ,लातूर खरिप २०१४ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीच्या एकूण २१८ कोटीच्या निधीपैकी २०७ कोटी वाटप करण्यात आले आहे़ उर्वरीत १०़५३ कोटीचा निधी, सामुहिक क्षेत्रातील वाद, बँक खाते काढण्यातील अडचणी यामुळे अद्यापही रखडला आहे़ ‘लोकमत’ हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीतून हे वास्तव समोर आले आहे़ खरीप हंगाम २०१४ मध्ये बाधीत शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने २१८़२ कोटीची आर्थिक मदत जिल्हा प्रशासनाकडे १० जुलै रोजी आली़ ही मदत लातूर जिल्ह्यातील ६ लाख २१ हजार २६६़९० हेक्टरसाठी आली असून, यापैकी पहिल्या टप्प्यात १७५़७३ कोटींचे वाटप करण्यात आले़ त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४२़३० कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला़ त्यामुळे एकूण २१८ कोटींपैकी २०७़५० कोटीचा निधी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे़ परंतू, काही शेतकऱ्यांचे सामाईक क्षेत्रातील वाद, न्यायालयीन प्रकरणे, मयत शेतकरी, बाहेरगावी कामानिमित्त राहत असलेले शेतकरी यांनी बँक खातेच काढले नसल्याने उर्वरीत १०़५३ कोटींचा निधी अद्यापही जिल्हा प्रशासनाकडे पडून राहिला आहे़ जिल्हा प्रशासनाकडे राहिलेल्या निधीची माहिती शेतकऱ्याला नसल्यामुळे सदरील शेतकरी बँकेच्या शाखेकडे चकरा मारण्यात परेशान आहेत़ परंतू त्यांना बँकेच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून अपेक्षीत माहिती मिळत नसल्यामुळे आशा हजारो शेतकऱ्यांचा दुष्काळी मदत निधी अद्यापही रखडला असल्याने शेतकऱ्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ बँकेकडे चकरा मारुन थकलेल्या काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’च्या हेल्पलाईनचा आधार घेऊन तक्रारी मांडण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यामुळे लातूर जिल्ह्यातील २१८ कोटींपैकी १०़५३ कोटींचा निधी अद्यापही रखडला असल्याचे ८ शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन समोर आले आहे़ दुष्काळी मदतीपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकऱ्यांनी आपली दुष्काळी मदत आपल्यासह कुटुंबीयांना मिळावी, यासाठी दुष्काळी मदतीपासून वंचित राहिलेल्या राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाते क्रमांक देऊन आपल्या खात्यावरील दुष्काळी मदत घ्यावी, असे आवाहन नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी केले आहे़ दुष्काळी स्थितीमुळे राज्य शासनाने अन्नसुरक्षा योेजनेतून शेतकऱ्यांना दोन रुपये दराने तांदूळ आणि तीन रुपये दराने गहू देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सातबारा घेऊन शेतकरी दुकानात जात आहेत. परंतु यादीत नाव नाही म्हणून दुकानदार परत पाठवित आहेत. पर्यार्याने हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांना दुकानातून रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेप्रमाणे धान्य मिळते, तसे धान्य शेतमजुरांना का नाही ? असा सवाल शेतमजुरांमधून केला जात आहे. शेतकऱ्यांच्या घरी किमान काहीतरी असते. परंतु ज्याच्या घरी काहीच नाही ते शेतमजूर उपाशी मरत आहेत, असे औसा तालुक्यगातील सिंदाळवाडी (टेंबी) चे सय्यद गुलाम महमंद यांनी सांगितले. ४काही गावांनी शेतकऱ्यांची वाटमारी केली जात असून गरजेपेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याचे दूरध्वनी ‘लोकमत हेल्पलाईन’वर आले आहेत. त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय सातबारा दाखविल्यावर शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेप्रमाणे मिळते पण शेतमजुरांच्या धान्याबाबत शासन निर्णय घेणार आहे की नाही ? असा सवाल शेतमजुरांमधून आहे. ४‘लोकमत’ने सुरु केलेल्या हेल्पलाईनवर सर्वाधिक भ्रमणध्वनी आले ते फक्त अन्नसुरक्षेतील दरानुसार अन्न मिळत नसल्याचेच. अहमदपूर तालुक्यातील हडोळती, किनगाव, लातूर तालुक्यातील गाधवड, गंगापूर, चिंचोली बु., औसा तालुक्यातील भादा, उजनी, आशिव, किल्लारी, निलंगा तालुक्यातील निटूर, अंबुलगा, शिरुर अनंतापळसह तालुक्यातील साकोळ, उदगीर शहरसह तालुक्यातील वाढवणा बु., नागलगाव तांडा, जळकोट, देवणी, रेणापूर तालुक्यातील अनेक गावांतून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या़