शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जिल्ह्यावर दुष्काळाची गर्द छटा

By admin | Updated: July 6, 2014 00:24 IST

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांचा दुष्काळ आणि उन्हाळ्यात झालेली गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांचा दुष्काळ आणि उन्हाळ्यात झालेली गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ पावसाने ओढ दिल्याने यंदाचा खरीप हंगामही धोक्यात आला असून, आजवर केवळ ६ टक्के पेरणी झाली आहे़ पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल ८१ साठवण तलाव कोरडेठाक पडले असून, उर्वरित साठवण तलावात केवळ ३़३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ या परिस्थितीत चालू आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही तर शहरासह ग्रामीण भागातही तीव्र पाणीटंचाईसह भीषण दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़जिल्ह्यातील नागरिकांनी सलग तीन वर्षांचा भीषण दुष्काळ अनुभवला़ गतवर्षीच्या न भुतो न भविष्यती अशा दुष्काळाचाही जिल्ह्याने सामना केला़ दुष्काळानंतर चांगल्या परिस्थितीची अपेक्षा करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रबी हंगाम अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिरावून नेला़ शासनाकडून मिळणारा तुटपुंजा निधीही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही़ गतवर्षी जुलै महिन्यात जवळपास ५६ टक्के पेरणी झाली होती़ यंदा मात्र, पावसाने मोठी ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या ३ लाख, ९० हजार, ५०० हेक्टरपैकी केवळ २५़३८०० हेक्टरवर ६ टक्के पेरणी झाली आहे़ गत महिन्यात तुळजापूर व उमरगा तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती़ त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील १८़६६०० हेक्टरवर तर उमरगा तालुक्यातील ६़१००० हेक्टरवर पेरणी झाली आहे़ उर्वरित तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत़ पेरणीपूर्व मशागतीची कामे केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, चालू आठवड्यात पाऊस झाला नाही, तर अनेक पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे़ जिल्ह्यातील २११ प्रकल्पापैकी ७७ लघु आणि ४ मध्यम असे ८१ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ यात परंडा तालुक्यातील साकत, खंडेश्वरी, चांदणी व कळंब तालुक्यातील रायगव्हाण या मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे़ तर उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी, भूम तालुक्यातील संगमेश्वर, परंडा तालुक्यातील खासापुरी या प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे़ उर्वरित साठवण तलावात २१़४९६ दलघमी म्हणजे ३़३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ (प्रतिनिधी)