शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर दुष्काळाची गर्द छटा

By admin | Updated: July 6, 2014 00:24 IST

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांचा दुष्काळ आणि उन्हाळ्यात झालेली गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांचा दुष्काळ आणि उन्हाळ्यात झालेली गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ पावसाने ओढ दिल्याने यंदाचा खरीप हंगामही धोक्यात आला असून, आजवर केवळ ६ टक्के पेरणी झाली आहे़ पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल ८१ साठवण तलाव कोरडेठाक पडले असून, उर्वरित साठवण तलावात केवळ ३़३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ या परिस्थितीत चालू आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही तर शहरासह ग्रामीण भागातही तीव्र पाणीटंचाईसह भीषण दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़जिल्ह्यातील नागरिकांनी सलग तीन वर्षांचा भीषण दुष्काळ अनुभवला़ गतवर्षीच्या न भुतो न भविष्यती अशा दुष्काळाचाही जिल्ह्याने सामना केला़ दुष्काळानंतर चांगल्या परिस्थितीची अपेक्षा करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रबी हंगाम अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिरावून नेला़ शासनाकडून मिळणारा तुटपुंजा निधीही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही़ गतवर्षी जुलै महिन्यात जवळपास ५६ टक्के पेरणी झाली होती़ यंदा मात्र, पावसाने मोठी ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या ३ लाख, ९० हजार, ५०० हेक्टरपैकी केवळ २५़३८०० हेक्टरवर ६ टक्के पेरणी झाली आहे़ गत महिन्यात तुळजापूर व उमरगा तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती़ त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील १८़६६०० हेक्टरवर तर उमरगा तालुक्यातील ६़१००० हेक्टरवर पेरणी झाली आहे़ उर्वरित तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत़ पेरणीपूर्व मशागतीची कामे केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, चालू आठवड्यात पाऊस झाला नाही, तर अनेक पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे़ जिल्ह्यातील २११ प्रकल्पापैकी ७७ लघु आणि ४ मध्यम असे ८१ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ यात परंडा तालुक्यातील साकत, खंडेश्वरी, चांदणी व कळंब तालुक्यातील रायगव्हाण या मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे़ तर उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी, भूम तालुक्यातील संगमेश्वर, परंडा तालुक्यातील खासापुरी या प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे़ उर्वरित साठवण तलावात २१़४९६ दलघमी म्हणजे ३़३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ (प्रतिनिधी)