शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

धुवांधार पावसामुळे दुष्काळ संपला असे म्हणता येणार नाही

By admin | Updated: September 20, 2015 01:11 IST

औरंगाबाद : दोन दिवसांत मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे रबीची पेरणी वाढणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत नियोजन सुरू आहे.

औरंगाबाद : दोन दिवसांत मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे रबीची पेरणी वाढणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत नियोजन सुरू आहे. पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत तीन जिल्ह्यांत रोजगार, चारा आणि पाणीपुरवठ्याचे आव्हान मात्र कायम आहे. मराठवाड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी काही जिल्ह्यांत २० तासांपेक्षा अधिक वेळ दमदार वृष्टी झाली. या पावसामुळे मराठवाड्यातील पावसाची टक्केवारी पन्नास टक्क्यांच्या वर नेली असून, ती ५१.१२ टक्के इतकी झाली आहे. रबी हंगामालाही हा पाऊस पूरक ठरला आहे. ही परिस्थिती विशेषकरून हिंगोली, परभणी, जालना अािण औरंगाबाद जिल्ह्यांत आहे. उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत पावसाचा जोर नव्हता. बीड जिल्ह्यांतही रिमझिम पाऊसच झाला. यासंदर्भात महसूल यंत्रणेकडून आढावा घेतला जात आहे. मराठवाड्यात यंदाच्या हंगामात उशिरा पावसामुळे पिके हातची गेली. तरीही हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत बऱ्यापैकी परिस्थिती होती. लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद आणि नांदेड या सहा जिल्ह्यांतील पीक आणि पाण्याची परिस्थिती चांगली नव्हती. विशेषकरून बीड आणि लातूर जिल्ह्यांत परिस्थिती बिकट होती. दोन दिवसांच्या पावसामुळे औरंगाबाद, जालना आणि नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुसह्य झाला आहे. लातूर, उस्मानाबाद आणि बीडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही काळानंतर उद्भवणार आहे. विभागीय आयुक्तालयातर्फे दोन दिवसांत झालेल्या पावसानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप मिळालेली नाही. महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांवरील संकट कायम आहे. काही प्रमाणात रबीला हा पाऊस पोषक ठरला आहे. मात्र, परिस्थिती सुसह्य झाली, असे म्हणता येईल. प्रशासन कामाला लागले खरीप वाया गेल्याने यावेळी बीड जिल्ह्यात रबीची पेरणी ४ लाख हेक्टरपेक्षा अधिक होईल. शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.शेतमजुरांसाठी नरेगाचे काम देण्याचे नियोजन केले आहे. सध्या जलयुक्त शिवाराची जी कामे झाली आहेत त्यामुळे पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे असे ‘लोकमत’ला बोलताना बीड चे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.