शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

ठिबकवरील कपाशी धोक्यात

By admin | Updated: June 29, 2014 00:44 IST

भोकरदन : जून महिना संपत आला तरी पाऊस आला नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या कपाशीचे पीक पिवळे पडत आहे.

भोकरदन : जून महिना संपत आला तरी पाऊस आला नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या कपाशीचे पीक पिवळे पडत आहे. एकूणच पावसामुळे शेतकरी तसेच व्यापारीवर्गातून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.तालुक्यात गेल्या वर्षी १ जूनलाच पिकाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी जून महिना संपत आला तरीसुध्दा एकही मोठा पाऊस झालेला नाही. परिणामी, सर्वच ठिकाणच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, त्यांनी ठिबक सिंचनावर कपाशी, मिरचीची लागवड केली, ती पिके पिवळी पडत आहे. वाढ खुंटली आहे. उन्हाळी पिकांसाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र पावसाने चांगलीच ओढ दिल्याने सर्वच होत्याचे नव्हते झाले आहे. तालुक्यात खरीप पेरणी खोळंबली आहे. भोकरदन परिसरातील रामेश्वर सोनाजी राऊत यांनी गट नंबर २९ मध्ये २० मे रोजी ८ एकरमध्ये कपाशीची लागवड केली. पीकसुध्दा चांगले जोमदार आले. मात्र लागवडीनंतर २० दिवसांनी कपाशीची झाडे पिवळी पडू लागली आहेत. तसेच वाढ खुंटली आहे. अनेक फवारण्या केल्या. खत दिले तरीसुध्दा कपाशीचा पिवळेपणा गेलेला नाही. सदर सीडस् कंपनीच्या अधिकाऱ्यांनी औषधी फवारणी करण्यास सांगितले. आठ दिवसांत पीक सुधारेल याची हमी दिली आहे. तसेच त्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडेसुध्दा धाव घेतली. मात्र कृषी कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तालुका कृषी अधिकारी व्यवहारे म्हणाले, आमच्याकडे शेतकऱ्याने अर्ज दिलेला आहे.दोन तीन दिवसांमध्ये बदनापूर येथील तज्ज्ञांमार्फत कपाशी पिकाची तपासणी करण्यात येणार आहे.दरम्यान, पाऊस लांबत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गातून तीव्र चिंंता व्यक्त केली जात आहे. बियाणे तसेच इतर बाजारात शुकशुकाट आहे. बियाणे व्यापाऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुन साहित्य तसेच बियाणांची खरेदी केली. मात्र पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने बाजारात शुकशुकाट आहे. पाऊस पडल्यास शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांनाही लाखो रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)दिवसा ऊन रात्री चांदणेपरतूर: दिवसा जोराचा वारा, कडाक्याचे उन, रात्री चांदणे भर पावसाळ्यात असे चित्र निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जून संपत आला असला तरी पावसाचा पत्ताच नाही. पावसाळ्यातही उन्हाळ्याच्या खुणा कायम आहेत. उन्हाचा कडाका, जोराचा वारा, यामुळे जलसाठ्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. सर्वत्र पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांनी पेरणी योग्य जमिनी करून ठेवल्या असल्या तरी, पावसाचा पत्ताच नाही, अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतं काळीभोर आहेत. काही शेतकऱ्यांनी ठिबकवर कापसाची लागवड केली आहे. पाउसच नसल्याने ठिबकसाठीही पाणी कमी पडत असल्याने हे पिके माना टाकत आहेत. एकूणच पावसाने दडी मारल्याने व पेरणीची वेळ निघून जात असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत.