शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

पिण्याच्या पाण्याची जागा अखेर चकाचक

By admin | Updated: April 20, 2016 00:40 IST

औरंगाबाद : एस. टी. महामंडळ प्रशासनाने प्रचंड अस्वच्छता असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याची जागा अखेर चकाचक केली.

औरंगाबाद : एस. टी. महामंडळ प्रशासनाने प्रचंड अस्वच्छता असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याची जागा अखेर चकाचक केली. पिण्याच्या पाण्याचा नळ असलेल्या परिसरात अस्वच्छता पसरलेली असताना गेली अनेक महिने महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष नव्हते. परंतु ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच या जागेची स्वच्छता करून नेहमीच त्याकडे लक्ष देण्याची सक्त सूचना प्रशासनाने केली आहे.मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारतीवर सिमेंट आणि प्लास्टिकच्या टाक्या आहेत. या टाक्यातील पाणी फ्रिजरमध्ये घेऊन बसस्थानकातील नळातून प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे; परंतु या नळाच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तहान भागण्याऐवजी आजारांना आमंत्रण मिळण्यास हातभार लागत आहे. त्यामुळे येथील पाणी पिण्याचे टाळले जात होते. अशा परिस्थितीत बाटलीबंद पाण्याशिवाय पर्याय नव्हता. तरीही या जागेची नियमित स्वच्छता करण्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. अनेक प्रवासी पाणी पिण्याचे टाळत होते. परंतु गोरगरीब प्रवाशांना नाईलाजाने हे पाणी प्यावे लागत होते. या पाण्यामुळे तहान तर भागते. परंतु अस्वच्छतेने प्रवाशांचे आरोग्य मात्र, धोक्यात येत होते. मध्यवर्ती बसस्थानकातील या परिस्थितीचे ‘लोकमत’मधून २७ मार्च रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले. वृत्त प्रकाशित होताच जागे झालेल्या महामंडळ प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची जागा स्वच्छ करण्याची सूचना केली. त्यानंतर ही जागा चकाचक करण्यात आली आहे. नळाच्या परिसरातील स्वच्छतेमुळे पाणी पिण्यासाठी येणारे प्रवासी सुखावत आहेत. यापुढे नेहमी ही जागा स्वच्छ दिसेल, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.