शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

पिण्याच्या पाण्याचा शहरात ठणठणाट !

By admin | Updated: July 27, 2015 01:11 IST

लातूर : लातूर शहरात गेल्या १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मांजरा प्रकल्पावरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीत लिकेज झाल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले

लातूर : लातूर शहरात गेल्या १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मांजरा प्रकल्पावरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीत लिकेज झाल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले असल्याचे मनपाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. रविवारी शहराच्या पूर्व भागातील काही नगरांत नळाला पाणी सोडले गेले. परंतु, अर्ध्या तासातच पाणीपुरवठा बंद झाला. परिणामी, नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.प्रभागनिहाय पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक मनपाने प्रसिद्ध केले आहे. मात्र या वेळापत्रकाप्रमाणे गेल्या महिनाभरापासून पाणी सोडले जात नाही. कधी तांत्रिक अडचण तर कधी काटकसर करण्याचे कारण सांगून वेळापत्रक पाळले जात नाही. दहा दिवसांआड सोडण्यात येणारे पाणी आता कधी पंधरा तर कधी १७-१८ दिवस सोडले जात नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. नागरिकांची मागणी वाढल्यामुळे पाण्याचे दरही वधारले आहेत. एका टँकरला ४५० ते ५०० रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय, ते पाणी पिण्यायोग्यही नाही. त्यामुळे काही मध्यमवर्गीय लोक जार वॉटर खरेदी करीत आहेत. २० लिटर्सच्या एका जार वॉटरला ३० रुपये तर चांगल्या कंपनीच्या २० लिटर्सच्याच एका जारला ३०, ४०, ५० रुपये देऊन पाणी घ्यावे लागत आहे. परंतु, हे पाणीही पिण्यासाठी योग्य असेल याची खात्री नाही. परंतु, मनपाकडून पाणीपुरवठाच होत नसल्यामुळे पाणी विकत घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. लातूर शहरातील पश्चिम भागातील प्रकाश नगर, विकास नगर, पाण्याची टाकी परिसर, संभाजी नगर अशा एक-दोन नगरांत रविवारी अर्धा तास पाणी सोडण्यात आले. परंतु नागरिकांना पुरेसे मिळाले नाही. चौधरी नगर, विक्रम नगर, सुभेदार रामजी नगर, पद्मा नगर परिसर, शाम नगर, संभाजी नगर, खाडगाव रोड परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पाणी सोडण्यात आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. लातूर शहरातील गाव परिसर व पूर्व भागात परिसरातही पाणीटंचाई आहे. १५ ते २० दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे. ४लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला असून, सध्या प्रकल्पात २़६३४ दलघमी पाणीसाठा आहे़ या प्रकल्पातून लातूर शहरासह अंबाजोगाई, धारुर, केज, कळंब आदी शहरांना पाणीपुरवठा केला जातो़ एकट्या लातूर शहराला दररोज ३५ एमएलडी पाणी दिले जाते़ प्रकल्पातील उपलब्ध साठा आणि उचल लक्षात घेता आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाणी पुरेल, असे सांगितले जात असले, तरी लातूर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून निर्जळी आहे.४गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असल्याने नागरिकांची गैरसोय आहे.