शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

हरीत गोलवाडी टेकडीचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 19:29 IST

वाळूज महानगर : पर्यावरण संवर्धन व संतुलन राखण्यासाठी हरित सिडको मोहिमेंतर्गत सिडको प्रशासन व उद्योजक यांनी सहा महिन्यांपूर्वी गोलवाडी ...

वाळूज महानगर : पर्यावरण संवर्धन व संतुलन राखण्यासाठी हरित सिडको मोहिमेंतर्गत सिडको प्रशासन व उद्योजक यांनी सहा महिन्यांपूर्वी गोलवाडी टेकडीचा विकास करुन हिरवीगार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप पाऊले उचलण्यात न हरीत टेकडीचे स्वप्न हवेत विरल्याचे दिसते. सध्या पर्यटकांचे आकर्षण असलेली टेकडी भकास झाल्याने ग्रामस्थांसह पर्यावरण प्रेमीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद-नगर महामार्गालगत असलेली गोलवाडी टेकडी वाळूज महानगरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखली जाते. पर्यटकांची संख्या वाढत असल्याने सिडको प्रशासनाने टेकडीचा विकास करुन वृक्षलागवडही केली होती. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टेकडीची दुरावस्था झाली. दरम्यान, येथे मद्यपी व टवाळखोरांचा वावर वाढल्याने नागरिकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे प्रशासनाने उद्योजकांच्या मदतीने टेकडीचा विकास करण्याचा निर्णय घेतला. मासिआ व बजाज अ‍ॅटो कंपनीनेही या टेकडीच्या विकासाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या अनुषंगाने सिडको प्रशासन, मासिआ व बजाज अ‍ॅटो यांनी संयुक्तरित्या १४ जून रोजी गोलवाडी येथे ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. बैठकीत पर्यटनाच्या दृष्टिने सर्वागीन विकास करुन टेकडीवर विविध प्रकारची झाडे लावून टेकडी हिरवीगार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात विकास कामाचा शुभारंभ करण्याचेही ठरले होते. यात मासिआ व बजाज यांनी झाडे लावण्याची तर सिडकोने संपूर्ण झाडांना तारेचे कुंपन करुन ठिबकद्वारे पाणी देण्याची जबाबदारी स्विकारली होती. याच बरोबर गोलवाडी ग्रामस्थांवर संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

दरम्यान, टेकडीच्या विकासाकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे टेकडीची भकास अवस्था झाली आहे. प्रशासनासह उद्योजकांना आपल्याच निर्णयाचा विसर पडल्याने गोलवाडी टेकडी हिरवीगार करण्याचे स्वप्न हवेत विरले आहे. यासंदर्भात सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.टेकडी झाली भकास ..गोलवाडी टेकडीवरील नवीन वृक्षलागवड झाली तरच नाहीच पूर्वीची वृक्षेही जळून गेली आहेत. टेकडी एका बाजूने तर अर्ध्यापेक्षा अधिक टेकडीचा भाग जळालेला आहे. पायऱ्या मोडकळीस आल्या असून, काही ठिकाणी तुटल्या आहेत. झाडांसाठी काही ठिकाणी बसविलेले ठिबकचे पाईप तुटले आहेत. गेटचीही दुरावस्था झाली आहे. झाडा अभावी टेकडी भकास दिसत आहे.मुलभूत सुविधांशिवाय विकास अशक्यटेकडीवर संरक्षक भिंतीचे काम अद्याप झाले नाही. पाण्याची सोय नाही. अनेकवेळा झाडे लावल्यानंतर जनावरामुळे झाडे नष्ट होत आहेत. शिवाय यंदा पाऊसही कमी होता. लावलेली झाडे वाळून जातील म्हणून काम स्थगित करण्यात आले आहे. या पावसाळ्यात हे काम हाती घ्यावे लागेल. उद्योजकांना टेकडीचा विकास करावयाचा आहे. पण त्या ठिकाणी मुलभूत सुविधा झाल्याशिवाय विकास करणे शक्य नाही. असे मासिआचे माजी अध्यक्ष सुनिल किर्दत यांनी लोकमतशी बोलतना सांगितले.वृक्ष लागवडीसाठी श्रमदानाची व वृक्ष संरक्षणाची जबाबदारी घेतली. या संदर्भात प्रशासन व उद्योजक यांच्याशी दोनवेळा बोलणी झाली. पण त्यांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने टेकडी हिरवीगार करण्याचे स्वप्न हवेत विरल्याची खंत गोलवाडीच्या सरपंच मनिषा बाबासाहेब धोंडरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीcidcoसिडको