शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

हरीत गोलवाडी टेकडीचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 19:29 IST

वाळूज महानगर : पर्यावरण संवर्धन व संतुलन राखण्यासाठी हरित सिडको मोहिमेंतर्गत सिडको प्रशासन व उद्योजक यांनी सहा महिन्यांपूर्वी गोलवाडी ...

वाळूज महानगर : पर्यावरण संवर्धन व संतुलन राखण्यासाठी हरित सिडको मोहिमेंतर्गत सिडको प्रशासन व उद्योजक यांनी सहा महिन्यांपूर्वी गोलवाडी टेकडीचा विकास करुन हिरवीगार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप पाऊले उचलण्यात न हरीत टेकडीचे स्वप्न हवेत विरल्याचे दिसते. सध्या पर्यटकांचे आकर्षण असलेली टेकडी भकास झाल्याने ग्रामस्थांसह पर्यावरण प्रेमीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद-नगर महामार्गालगत असलेली गोलवाडी टेकडी वाळूज महानगरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखली जाते. पर्यटकांची संख्या वाढत असल्याने सिडको प्रशासनाने टेकडीचा विकास करुन वृक्षलागवडही केली होती. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टेकडीची दुरावस्था झाली. दरम्यान, येथे मद्यपी व टवाळखोरांचा वावर वाढल्याने नागरिकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे प्रशासनाने उद्योजकांच्या मदतीने टेकडीचा विकास करण्याचा निर्णय घेतला. मासिआ व बजाज अ‍ॅटो कंपनीनेही या टेकडीच्या विकासाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या अनुषंगाने सिडको प्रशासन, मासिआ व बजाज अ‍ॅटो यांनी संयुक्तरित्या १४ जून रोजी गोलवाडी येथे ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. बैठकीत पर्यटनाच्या दृष्टिने सर्वागीन विकास करुन टेकडीवर विविध प्रकारची झाडे लावून टेकडी हिरवीगार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात विकास कामाचा शुभारंभ करण्याचेही ठरले होते. यात मासिआ व बजाज यांनी झाडे लावण्याची तर सिडकोने संपूर्ण झाडांना तारेचे कुंपन करुन ठिबकद्वारे पाणी देण्याची जबाबदारी स्विकारली होती. याच बरोबर गोलवाडी ग्रामस्थांवर संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

दरम्यान, टेकडीच्या विकासाकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे टेकडीची भकास अवस्था झाली आहे. प्रशासनासह उद्योजकांना आपल्याच निर्णयाचा विसर पडल्याने गोलवाडी टेकडी हिरवीगार करण्याचे स्वप्न हवेत विरले आहे. यासंदर्भात सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.टेकडी झाली भकास ..गोलवाडी टेकडीवरील नवीन वृक्षलागवड झाली तरच नाहीच पूर्वीची वृक्षेही जळून गेली आहेत. टेकडी एका बाजूने तर अर्ध्यापेक्षा अधिक टेकडीचा भाग जळालेला आहे. पायऱ्या मोडकळीस आल्या असून, काही ठिकाणी तुटल्या आहेत. झाडांसाठी काही ठिकाणी बसविलेले ठिबकचे पाईप तुटले आहेत. गेटचीही दुरावस्था झाली आहे. झाडा अभावी टेकडी भकास दिसत आहे.मुलभूत सुविधांशिवाय विकास अशक्यटेकडीवर संरक्षक भिंतीचे काम अद्याप झाले नाही. पाण्याची सोय नाही. अनेकवेळा झाडे लावल्यानंतर जनावरामुळे झाडे नष्ट होत आहेत. शिवाय यंदा पाऊसही कमी होता. लावलेली झाडे वाळून जातील म्हणून काम स्थगित करण्यात आले आहे. या पावसाळ्यात हे काम हाती घ्यावे लागेल. उद्योजकांना टेकडीचा विकास करावयाचा आहे. पण त्या ठिकाणी मुलभूत सुविधा झाल्याशिवाय विकास करणे शक्य नाही. असे मासिआचे माजी अध्यक्ष सुनिल किर्दत यांनी लोकमतशी बोलतना सांगितले.वृक्ष लागवडीसाठी श्रमदानाची व वृक्ष संरक्षणाची जबाबदारी घेतली. या संदर्भात प्रशासन व उद्योजक यांच्याशी दोनवेळा बोलणी झाली. पण त्यांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने टेकडी हिरवीगार करण्याचे स्वप्न हवेत विरल्याची खंत गोलवाडीच्या सरपंच मनिषा बाबासाहेब धोंडरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीcidcoसिडको