शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

नदीपात्रातील वाळूपट्टे झाले सामसूम

By admin | Updated: June 30, 2014 00:40 IST

भोकरदन/केदारखेडा : तालुक्यात महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाळूच्या अवैध उपशाप्रकरणी स्टिंग आॅपरेशनद्वारे केलेल्या कारवाईत ५ कोटींची वाळू व ३ कोटींची वाहने जप्त केली.

भोकरदन/केदारखेडा : तालुक्यात शनिवारी महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाळूच्या अवैध उपशाप्रकरणी गव्हाण संगमेश्वर आणि पूर्णा नदीपात्रात स्टिंग आॅपरेशनद्वारे केलेल्या कारवाईत ५ कोटींची वाळू व ३ कोटींची वाहने जप्त केली. भोकरदन पोलिस ठाण्यात ४३ ट्रकचालक व मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून रविवारी दुसऱ्या दिवशी नदीपात्र परिसरात सामसूम होती. उपविभागीय अधिकारी डॉ. एन.आर. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रुपा चित्रक, जाफराबादचे तहसीलदार संदीप ढाकणे, नायब तहसीलदार आर.जे. डोळे यांच्यासह २० कर्मचारी तसेच भोकरदन व टेंभूर्णी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी वाळूपट्ट्यांवर छापे मारले होते. गव्हाण संगमेश्वर हे गाव भोकरदन तालुक्यात येत असले तरी ते जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे गुन्हा भोकरदन पोलिस ठाण्यात दाखल करायचा की, टेंभुणी पोलिस ठाण्यात याविषयी शनिवारी रात्री अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. जवखेडा ठोंबरी व केदारखेडा हे भोकरदन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे शेवटी भोकरदन पोलिस ठाण्यात ४३ वाहनांच्या चालक व मालकांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र काही वाहनांच्या मालकांमध्ये अनेक मातब्बरांचा समावेश असण्याची शक्यता असल्याने त्यांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनांच्या क्रमांकावरून पोलिसांना वाहन मालकाचा शोध घ्यावा लागणार आहे.वाळूचा अवैध उपसा करण्यासाठी जी वाहने वापरण्यात आली, त्यामध्ये फार कमी वाहने जालना आरटीओ पासिंगची आहेत. बऱ्याच वाहनांवरील क्रमांक बनावट असण्याची शक्यता आहे. तर त्यातील काही वाहने बाहेरच्या पासिंगची आहेत. त्यामुळे पोलिसांना जालना, औरंगाबाद, धूळे, अहमदनगर, मुंबई, जळगाव आदी जिल्ह्यांमध्ये शोध घ्यावा लागणार आहे.आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके स्थापन करण्यात येणार असून वाहनांवर बनावट क्रमांक आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध आणखी गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी दिली. ज्या २२ वाहनांचे चालक-मालक वाहनासह पसार झाले, त्यांचाही शोध घेण्यात येणार आहे. (वार्ताहर)वाळूमाफियांचे धाबे दणाणलेमहसूल प्रशासनाकडून वाळूचा अवैध उपसा केल्याप्रकरणी आतापर्यंत अनेक कारवाया झाल्या. मात्र त्या थातूरमातूर होत्या. शनिवारी महसूल व पोलिस पथकाने केलेल्या कारवाईमुळे नेहमी गजबजणारे पूर्णा नदीच्या पात्रात रविवारी सामसूम होता. अन्यथा या भागात वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. केदारखेड्यासह मेरखेडा, बामखेडा, जवखेडा ठोंबरे, वालसा खालसा, वालसा डावरगाव, बोरगाव तारू, देऊळगाव ताड, नळणी आदी गावाच्या भागातील गिरजा, पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जातो. आठ दिवसांपूर्वीच केदारखेडा, वालसा या दोन वाळूपट्ट्यांची व वाळूचे साठे करणाऱ्यांविरुद्ध स्वत: उपविभागीय अधिकारी डॉ. शेळके यांनी कारवाई केली होती.