नगरपंचायत : ७५० कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्नएस़आऱमुळे ल्ल शिरूर अनंतपाळ येथील नगरपंचायतीअंतर्गत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची विविध कामे करण्यासाठी दोन महिन्यापूर्वी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़ आराखड्यातील त्रुटींची पूर्तता करूनही अद्यापपर्यंत त्यास मंजुरी मिळाली नसल्याने साडेसातशे मजूर कुटुंबासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सिंचन विहिरी तसेच घरकूल मंजूर होऊनही लाभार्थ्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय असे तिहेरी खेटे घालावे लागत आहे़ त्यामुळे रोजगार हमी कृती आराखडा रखडाला आहे़ शिरूर अनंतपाळ शहराचा चौफेर विकास व्हावा़ यासाठी नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली़ या प्रक्रियेला वर्ष उलटले़ परंतू, विकासाऐवजी अडसरच निर्माण झाला असल्याचे चित्र नागरिकांना पहायला मिळत आहे़ शहरातील साडेसातशेपेक्षा अधिक मजूर कुटुंबाच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीस कृती आराखडा तयार होऊन मंजुरीसाठी पाठविण्यात आला़ परंतू, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्रुटी काढून तो परत पाठविण्यात आला आहे़ पुन्हा त्रुटी दूर करून कृती आराखडा पाठविला़ परंतू, मंजुरी मात्र मिळाली नाही़ मनरेगाअंतर्गत झालेल्या पाच सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांना तसेच घरकूल मंजुरी मिळालेल्या २६१ बीपीएल लाभधारकांना लाभ मिळविण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, असे तिहेरी खेटे मारावे लागत आहेत़ त्यामुळे कृती आराखडा मंजूर होणे गरजचे आहे़ कृती आराखडा मंजूर झाला तरच लाभार्थ्यांची अडचण दूर होणार आहे़ मंजुरीनंतरच मिळणार विकासाला गतीदरम्यान, नागनाथ धडे, बाबुराव संभाळे, सुरेश कोटलवार, मनोहर सामनगावे, रमाकांत बापुरे यांना सिंचन विहिरी मंजुरी झाल्या आहेत़ तर २६१ बीपीलएलधारकांना घरकुले मंजूर झाली आहेत़ परंतू, कृती आराखडाच लालफितीत अडकला असल्याने तो मंजूर होणे गरजेचे असल्याचे नगरसेवक गणेश धुमाळे, उपनगराध्यक्ष संतोष शेटे, नगराध्यक्ष भाग्यश्री देवंग्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मंगळवारी सांगितले़
मंजुरीत अडकला रोहयो आराखडा
By admin | Updated: May 4, 2016 00:19 IST