शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

डॉ. कलाम विज्ञान केंद्रातून घडतील विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:37 IST

आज स्पर्धात्मक विद्यार्थी घडत आहेत. विज्ञानात पैकीच्या पैकी गुण असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात एकदाही प्रयोग केलेले नसतात. विज्ञानाची गोडी लागावी यासाठी विज्ञान केंद्र महत्त्वाचे असून, महात्मा गांधी मिशन परिसरात सुरू झालेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स सेंटर भविष्यातील विज्ञानाचे विद्यार्थी आणि मार्गदर्शक घडविण्यात महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास भारतीय विज्ञान प्रसार मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आज स्पर्धात्मक विद्यार्थी घडत आहेत. विज्ञानात पैकीच्या पैकी गुण असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात एकदाही प्रयोग केलेले नसतात. विज्ञानाची गोडी लागावी यासाठी विज्ञान केंद्र महत्त्वाचे असून, महात्मा गांधी मिशन परिसरात सुरू झालेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स सेंटर भविष्यातील विज्ञानाचे विद्यार्थी आणि मार्गदर्शक घडविण्यात महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास भारतीय विज्ञान प्रसार मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे यांनी व्यक्त केला.डॉ. रानडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२२) विज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, अनुराधा कदम, विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर, जेएनईसी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य हरिरंग शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, डॉ. प्राप्ती देशमुख, रणजित कक्कड, सचिन मालेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.विज्ञान कें द्राच्या उद््घाटनानंतर डॉ. रानडे यांनी रुक्मिणी सभागृह येथे विद्यार्थ्यांना ‘खगोल, अंतराळ विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी’ याविषयी मार्गदर्शन केले. जीपीएस तंत्रज्ञान, सोलार सेल, कॅमेरा लेन्सेस किंवा विज्ञानाच्या इतर अनेक शाखांचे मूळ हे खगोलशास्त्रात असून, सध्या भारत या क्षेत्रात खूप मोठे प्रकल्प राबवीत आहे. त्यामुळे येत्या दहा वर्षांत विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असे डॉ. रानडे यांनी नमूद केले. तसेच संशोधनात कोणतीही कॉपी चालत नसल्याने खरोखर आवड असेल आणि या क्षेत्राबाबत कुतूहल आणि समजून घेण्याची वृत्ती असेल, तरच या क्षेत्रात या, असेही त्यांनी सुचविले. दरम्यान अंकुशराव कदम यांनी विज्ञान कें द्राची संकल्पना स्पष्ट केली. औंधकर यांनी विज्ञान कें द्राच्या कार्यप्रणालीवर मार्गदर्शन केले. बोराडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.काय आहे विज्ञान कें द्रविद्यार्थ्यांना हसत खेळत विज्ञान शिकवून विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी अंकुशराव कदम यांच्या कल्पकतेतून आणि श्रीनिवास औंधकर यांच्या परिश्रमातून साकारलेले हे विज्ञान केंद्र सर्वच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. विज्ञान खेळणी, रंजक उपकरणे, खगोल, अंतराळ, भौतिकशास्त्र, गणित या सर्वच विषयांची स्वतंत्र दालने, थ्रीडी दालन, सुसज्ज तारांगण, सूर्याचे अध्ययन करणारी सौर वेधशाळा, औरंगाबादचा स्थानिक वेळ सांगणारी सौर घड्याळ असे सर्वच या कें द्रात असून ते मराठवाड्यातील एकमेव केंद्र आहे. सोमवार सोडून उर्वरित दिवस हे केंद्र सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि खगोलप्रेमींसाठी खुले आहे.