शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

आठ हजार लसीचे डोस काही तासातच संपले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहरात ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून शुक्रवारी रात्री फक्त ८ हजार लस देण्यात ...

औरंगाबाद : शहरात ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून शुक्रवारी रात्री फक्त ८ हजार लस देण्यात आल्या. शनिवारी ३९ केंद्रांवर अवघ्या काही तासातच लस संपल्या. ७ हजार नागरिकांना फक्त दुसरा डोस देण्यात आला. ७०० पेक्षा अधिक नागरिकांना पहिला डोस दिला. मनपाकडे आता लसीकरण मोहीम राबविण्यासाठी लसचा मुबलक साठा नाही.

१८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्याची घोषणा केंद्राने केली आहे. शहराला दररोज २० हजार डोसची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात ८ ते १० हजारच लस मिळत आहे. एकदा साठा मिळाल्यानंतर किमान चार ते पाच दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागते. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात सध्या ५५ हजारहून अधिक नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. या आठवड्यांत चार दिवसानंतर महापालिकेला ८ हजार लस मिळाल्याने शनिवारी ३९ केंद्रावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आले. त्याकरिता ३४ केंद्रांवर व्यवस्था केली. लस आल्याचे कळताच सकाळपासूनच केंद्रावर कुपन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती. कुपन घेतल्यानंतरही काही नागरिक थेट केंद्रावर लस घेण्यासाठी दाखल झाले. दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची केंद्रावर प्रचंड गर्दी उसळली. प्रत्येक केंद्रावर १५० लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले. दिवसभरात साडेसहा हजार नागरिकाचे लसीकरण झाले. अनेकांना दुसरा डोस न घेताच माघारी फिरावे लागले.

पहिल्या डोससाठी ऑनलाईन नोंदणी

पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांना कोविन अ‍ॅपवर नोंदणी करण्याचे आवाहन मनपाने केले होते. पहिल्या डोससाठी पाच केंद्रांवर व्यवस्था केली होती. प्रत्येक केंद्रावर २०० लस देण्यात आल्या. त्यापैकी सातशे ते आठशे नागरिकांना पहिला डोस देण्यात आला. उद्या रविवार, ११ जुलै रोजी सुटी असल्याने लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. शासनाकडून साठा प्राप्त झाला तरच सोमवारी लसीकरण शक्य आहे.