शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
7
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
8
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
9
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
10
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
11
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
12
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
13
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
14
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
15
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
16
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
17
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
18
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
19
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
20
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

घाणेवाडीची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:04 IST

जालना : शहराचा पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या घाणेवाडी जलाशयाच्या देखभालीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराचा पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या घाणेवाडी जलाशयाच्या देखभालीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. लाखो नागरिक दररोज ज्या जलाशयाचे पाणी पितात, तिथे सुरक्षारक्षकही नियुक्त नाही. काटेरी झुडपे, मोठी झाडे यामुळे संरक्षक भिंतीला तडे गेल्याचे सोमवारी लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.निजामकालीन घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना शहराला गुरुत्वाकर्षण पद्धतीने विनाखर्च पाणी उपलब्ध होते. याउलट परिस्थिती जायकवाडी-जालना पाणीपुरवठ्याची आहे. जायकवाडीच्या पाण्यासाठी पालिकेला महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे घाणेवाडी जलाशयाच्या देखभालीकडे पालिका प्रशासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने जलाशयाची सुरक्षा धोक्यात आली आहे. जलाशयाच्या आतील बाजूच्या संरक्षण भिंतीवर ठिकठिकाणी मोठी झाडे उगवली आहेत. संरक्षक भिंतीतून पाणी झिरपू नये यासाठी बसविण्यात आलेले दगड उखडत आहेत. वरील बाजूस काटेरी झुडपांमुळे संरक्षक भिंतीला पाझर फुटले आहेत. यातून झिरपणारे पाणी दुसऱ्या बाजूने थेट रस्त्यावर येत असल्याने जलसाठ्यात वाढ झाल्यास गळतीचा धोका निर्माण झाला आहे. संरक्षण भिंतीला काही ठिकाणी तडे गेले आहेत. सुरक्षारक्षक नसल्यामुळे जलाशयाच्या टाकीवर चढून अनेक जण ‘सेल्फी’ घेतात. सेल्फीच्या नादात एखादी व्यक्ती पाण्यात पडून दुर्घटना घडू शकते. जलाशयाच्या वरील बाजूस अनेकांनी अतिक्रमण करून शेती सुरू केली आहे. चार वर्षांपूर्वी या परिसरातील सर्व अतिक्रमणे हटवून पालिकेने सुमारे अडीचशे जणांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी न घेतल्याने परिस्थिती जैसे थे बनली आहे. गत वर्षी घाणेवाडी जलाशयाच्या संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, वर्ष उलटूनही या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.