शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन दीड वर्ष उलटले आहे. कोरोना संपला नसला तरी विळखा कमी झाल्याने ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन दीड वर्ष उलटले आहे. कोरोना संपला नसला तरी विळखा कमी झाल्याने जवळपास सर्वच व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, अद्यापही पॅसेंजर रेल्वे सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे रोज नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत, आर्थिक परवड होत आहे. कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का, असा सवाल या प्रवाशांतून उपस्थित होत आहे.

औरंगाबादहून सध्या सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. या रेल्वेत जनरल तिकीट बंद आहे. आरक्षण तिकिटाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही. जनरल तिकिटाअभावी आरक्षण तिकिटासाठी अधिक रक्कम मोजण्याची वेळ सर्वसामान्यांवर ओढवत आहे. रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने पॅसेंजर रेल्वे महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे कधी धावणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. पॅसेंजर रेल्वे यापुढे डेमू रेल्वे म्हणून चालविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे सांगण्यात आले. प्रवाशांच्या सुविधेसाठी जालना ते नाशिक आणि जालना ते इगतपुरी डेमू पॅसेंजर सुरू करण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे नमो रेल्वे संघटनेचे अध्यक्ष गौतम नाहाटा यांनी एका निवेदनाद्वारे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन

- सचखंड एक्स्प्रेस

- नंदीग्राम एक्स्प्रेस

- देवगिरी एक्स्प्रेस

- जनशताब्दी एक्स्प्रेस

- तपोवन एक्स्प्रेस

- अजंता एक्स्प्रेस

- रेणीगुंठा एक्स्प्रेस

- मराठवाडा एक्स्प्रेस

-----

मग पॅसेंजर बंद का?

-नांदेड-नगरसोल पॅसेंजर

-निजामाबाद - पुणे पॅसेंजर

-नांदेड - दौंड पॅसेंजर

- काचीगुडा - नगरसोल पॅसेंजर

- जालना - नगरसोल डेमू पॅसेंजर

---

एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नाही

एक्स्प्रेसचे नियम लावा

पेट्रोलचे दर वाढले आहे. त्यामुळे रोज अप-डाऊन करण्यासाठी दुचाकी वापरणे परवडत नाही. त्यामुळे पॅसेंजर सुरू करणे गरजेचे आहे. डेमू सुरू होणार म्हटले जाते. पॅसेंजर अथवा डेमू लवकर सुरू केल्या पाहिजेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे नियम एक्स्प्रेस रेल्वेंना आहेत, तेच नियम पॅसेंजरलाही लावता येतील.

- राजकुमार सोमाणी, रेल्वे प्रवासी संघटना

---

कमाईचे अर्धे पैसे प्रवासात

कामासाठी रोज लासूरहून ये-जा करावी लागते. रोज जेवढे पैसे मिळतात, त्यातील अर्धे पैसे ये-जा करण्यात जात आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. पॅसेंजर रेल्वे लवकरात लवकर सुरू केल्या पाहिजेत. रोज वाहनाने ये-जा करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही.

- आसीफ मुन्ना शहा, प्रवासी

---

मास्कचा वापर करावा

प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्कचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. आरक्षण तिकीट काढूनच रेल्वे प्रवास केला पाहिजे. त्याबरोबर प्लॅटफाॅर्म तिकीट काढूनच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसोबत येणाऱ्या इतरांनी प्रवेश केला पाहिजे.

- लक्ष्मीकांत जाखडे, स्टेशन व्यवस्थापक