शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारण कामाच्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:44 IST

राज्य सरकारने मराठवाड्यात राबविलेली जलयुक्त शिवार योजना आणि पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा या परस्पर पूरक योजना आहेत. वॉटर कप स्पर्धा आणि जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या जलसंधारण कामाच्या ठिकाणी पाणीसाठा झाल्यानंतर त्यात शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय करावा. यासाठी राज्य सरकारने एक योजना आणली असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य सरकारने मराठवाड्यात राबविलेली जलयुक्त शिवार योजना आणि पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा या परस्पर पूरक योजना आहेत. वॉटर कप स्पर्धा आणि जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या जलसंधारण कामाच्या ठिकाणी पाणीसाठा झाल्यानंतर त्यात शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय करावा. यासाठी राज्य सरकारने एक योजना आणली असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी येथे केले.पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील वैजापूर, फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट काम केलेल्या जलरत्नांचा गौरव समारंभ सोमवारी (दि.३०) तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजित केला होता. यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते तीन तालुक्यांतील १६८ जलरत्नांचा गौरव करण्यात आला. यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक नामदेव ननावरे, विभागीय समन्वयक संतोष शिनगारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. भापकर म्हणाले, शासनाकडून पाणी फाऊंडेशनने केलेल्या कामाच्या ठिकाणी शासकीय योजना राबविण्यास प्राधान्य असणार आहे. या संस्थेचे काम शासनास पूरक असेच आहे. या माध्यमातून मराठवाड्यात पाणी चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळाले आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी ज्या प्रमाणात चळवळ उभारली तशीच चळवळ आता निसर्ग जोपासण्यासाठी उभारावी लागणार आहे. झाडे जगविण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. शेतक-यांनी भरघोस उत्पन्न देणारी पिके घ्यावीत, यातही कमी पाणी लागणा-या पिकांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच सरकारने जलसंधारण झालेल्या ठिकाणी साचणा-या पाण्यात मत्स्य पालन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणाºया सुविधा पुरविण्यास राज्य सरकार तयार आहे. मराठवाड्यात ही योजना राबविण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध होणार आहे. यात शेतक-यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्य समन्वयक नामदेव ननावरे म्हणाले, पुढील वर्षीही या योजनेत तिन्ही तालुक्यांचा समावेश असणार आहे.यामुळे पुढील वर्षासाठी आतापासूनच तयारी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी केले. विनोद ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. बिभिषण भोईटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयgovernment schemeसरकारी योजना