शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जलसंधारण कामाच्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:44 IST

राज्य सरकारने मराठवाड्यात राबविलेली जलयुक्त शिवार योजना आणि पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा या परस्पर पूरक योजना आहेत. वॉटर कप स्पर्धा आणि जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या जलसंधारण कामाच्या ठिकाणी पाणीसाठा झाल्यानंतर त्यात शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय करावा. यासाठी राज्य सरकारने एक योजना आणली असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य सरकारने मराठवाड्यात राबविलेली जलयुक्त शिवार योजना आणि पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा या परस्पर पूरक योजना आहेत. वॉटर कप स्पर्धा आणि जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या जलसंधारण कामाच्या ठिकाणी पाणीसाठा झाल्यानंतर त्यात शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय करावा. यासाठी राज्य सरकारने एक योजना आणली असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी येथे केले.पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील वैजापूर, फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट काम केलेल्या जलरत्नांचा गौरव समारंभ सोमवारी (दि.३०) तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजित केला होता. यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते तीन तालुक्यांतील १६८ जलरत्नांचा गौरव करण्यात आला. यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक नामदेव ननावरे, विभागीय समन्वयक संतोष शिनगारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. भापकर म्हणाले, शासनाकडून पाणी फाऊंडेशनने केलेल्या कामाच्या ठिकाणी शासकीय योजना राबविण्यास प्राधान्य असणार आहे. या संस्थेचे काम शासनास पूरक असेच आहे. या माध्यमातून मराठवाड्यात पाणी चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळाले आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी ज्या प्रमाणात चळवळ उभारली तशीच चळवळ आता निसर्ग जोपासण्यासाठी उभारावी लागणार आहे. झाडे जगविण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. शेतक-यांनी भरघोस उत्पन्न देणारी पिके घ्यावीत, यातही कमी पाणी लागणा-या पिकांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच सरकारने जलसंधारण झालेल्या ठिकाणी साचणा-या पाण्यात मत्स्य पालन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणाºया सुविधा पुरविण्यास राज्य सरकार तयार आहे. मराठवाड्यात ही योजना राबविण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध होणार आहे. यात शेतक-यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्य समन्वयक नामदेव ननावरे म्हणाले, पुढील वर्षीही या योजनेत तिन्ही तालुक्यांचा समावेश असणार आहे.यामुळे पुढील वर्षासाठी आतापासूनच तयारी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी केले. विनोद ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. बिभिषण भोईटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयgovernment schemeसरकारी योजना