शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
3
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
4
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
5
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
6
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
7
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
8
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
9
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
10
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
11
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
12
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
13
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
14
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
15
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
16
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
17
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
18
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
19
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
20
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार

जलसंधारण कामाच्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:44 IST

राज्य सरकारने मराठवाड्यात राबविलेली जलयुक्त शिवार योजना आणि पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा या परस्पर पूरक योजना आहेत. वॉटर कप स्पर्धा आणि जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या जलसंधारण कामाच्या ठिकाणी पाणीसाठा झाल्यानंतर त्यात शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय करावा. यासाठी राज्य सरकारने एक योजना आणली असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य सरकारने मराठवाड्यात राबविलेली जलयुक्त शिवार योजना आणि पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा या परस्पर पूरक योजना आहेत. वॉटर कप स्पर्धा आणि जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या जलसंधारण कामाच्या ठिकाणी पाणीसाठा झाल्यानंतर त्यात शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय करावा. यासाठी राज्य सरकारने एक योजना आणली असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी येथे केले.पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील वैजापूर, फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट काम केलेल्या जलरत्नांचा गौरव समारंभ सोमवारी (दि.३०) तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजित केला होता. यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते तीन तालुक्यांतील १६८ जलरत्नांचा गौरव करण्यात आला. यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक नामदेव ननावरे, विभागीय समन्वयक संतोष शिनगारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. भापकर म्हणाले, शासनाकडून पाणी फाऊंडेशनने केलेल्या कामाच्या ठिकाणी शासकीय योजना राबविण्यास प्राधान्य असणार आहे. या संस्थेचे काम शासनास पूरक असेच आहे. या माध्यमातून मराठवाड्यात पाणी चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळाले आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी ज्या प्रमाणात चळवळ उभारली तशीच चळवळ आता निसर्ग जोपासण्यासाठी उभारावी लागणार आहे. झाडे जगविण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. शेतक-यांनी भरघोस उत्पन्न देणारी पिके घ्यावीत, यातही कमी पाणी लागणा-या पिकांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच सरकारने जलसंधारण झालेल्या ठिकाणी साचणा-या पाण्यात मत्स्य पालन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणाºया सुविधा पुरविण्यास राज्य सरकार तयार आहे. मराठवाड्यात ही योजना राबविण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध होणार आहे. यात शेतक-यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्य समन्वयक नामदेव ननावरे म्हणाले, पुढील वर्षीही या योजनेत तिन्ही तालुक्यांचा समावेश असणार आहे.यामुळे पुढील वर्षासाठी आतापासूनच तयारी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी केले. विनोद ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. बिभिषण भोईटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयgovernment schemeसरकारी योजना