शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना सक्षम करा

By admin | Updated: May 23, 2016 23:57 IST

उस्मानाबाद : कर्जमाफीवर आपला विश्वास नाही़ कारण मागील वेळी कर्जमाफी देण्यात आली होती़ सहा महिन्यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या होत्या़

महादेव जानकर : आरक्षणासाठी सरकार सकारात्मकउस्मानाबाद : कर्जमाफीवर आपला विश्वास नाही़ कारण मागील वेळी कर्जमाफी देण्यात आली होती़ सहा महिन्यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या होत्या़ आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ यासाठी शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, खते, औषधे, ठिबक आणि वीजपुरवठा केला तर शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होईल आणि आत्महत्या थांबतील असा विश्वास रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला़उस्मानाबाद येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जानकर म्हणाले, आपण इस्राईल देशाचा दौरा करून तेथील जलसंधारण आणि वीजपुरवठ्याची माहिती घेतली आहे़ आता राज्यात फिरून मोठ्या-मध्यम प्रकल्पांची पाहणी करून शासनाला अहवाल देणार आहोत़ कालव्यांमधून प्रकल्पाचे पाणी सोडले तर बाष्पीभवणातून व इतर कारणांनी पाण्याचा अपव्यय होतो़ त्यामुळे शेतकऱ्यांना थेट पाईपलाईनद्वारे पाणी देणे गरजेचे असून, शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करून शेती करणे आवश्यक आहे़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी ऐवजी त्यांना मोफत बी-बियाणे, खते, औषधे, वीजेचा पुरवठा करणे गरजेचे आहे़ शिवाय शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावाबाबत असलेले निकष बदलणे गरजेचे असून, जिल्ह्यातील नामंजूर झालेले ७६ प्रस्ताव मंजूर व्हावेत, मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत़ शिवाय राज्यात सर्वत्र हा निकष लागू व्हावा, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत़ वेळोवेळी आरक्षणाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर कोणी ना कोणी न्यायालयात गेल्याने तो प्रस्ताव बारगळला आहे़ हे शासन आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आरक्षण मिळावे यासाठी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू आहे़ या सर्वेक्षणाचा अहवाल आपण राज्य-केंद्राकडे सादर करणार असून, कोणीही या अहवालाला आव्हान दिले तर तो अहवाल टिकेल, असाच बनविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़ यावेळी बाळासाहेब पाटील-हाडोंग्रीकर, आश्रुबा कोळेकर, शिवाजी कोळेकर, आण्णा बंडगर आदीची उपस्थिती होती़ दरम्यान, महादेव जानकर यांनी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे जावून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़ पालिका, जिल्हा परिषद स्वबळावरमित्रपक्षांनी मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते़ त्यामुळे मी मंत्रीपद मागणे उचित नाही़ मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळणे गरजेचे आहे़ दिलेला शब्द पाळला नाही तर पुढील निवडणुकांमध्ये त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील़ शिवाय आगामी नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका रासपा स्वबळावर लढणार असल्याचेही जानकर यांनी यावेळी सांगितले़