शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
3
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
4
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
6
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्रा कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
7
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
8
दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
9
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
10
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
11
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
12
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
13
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
14
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
15
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
16
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
17
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
18
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
19
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
20
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील

कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना सक्षम करा

By admin | Updated: May 23, 2016 23:57 IST

उस्मानाबाद : कर्जमाफीवर आपला विश्वास नाही़ कारण मागील वेळी कर्जमाफी देण्यात आली होती़ सहा महिन्यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या होत्या़

महादेव जानकर : आरक्षणासाठी सरकार सकारात्मकउस्मानाबाद : कर्जमाफीवर आपला विश्वास नाही़ कारण मागील वेळी कर्जमाफी देण्यात आली होती़ सहा महिन्यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या होत्या़ आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ यासाठी शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, खते, औषधे, ठिबक आणि वीजपुरवठा केला तर शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होईल आणि आत्महत्या थांबतील असा विश्वास रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला़उस्मानाबाद येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जानकर म्हणाले, आपण इस्राईल देशाचा दौरा करून तेथील जलसंधारण आणि वीजपुरवठ्याची माहिती घेतली आहे़ आता राज्यात फिरून मोठ्या-मध्यम प्रकल्पांची पाहणी करून शासनाला अहवाल देणार आहोत़ कालव्यांमधून प्रकल्पाचे पाणी सोडले तर बाष्पीभवणातून व इतर कारणांनी पाण्याचा अपव्यय होतो़ त्यामुळे शेतकऱ्यांना थेट पाईपलाईनद्वारे पाणी देणे गरजेचे असून, शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करून शेती करणे आवश्यक आहे़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी ऐवजी त्यांना मोफत बी-बियाणे, खते, औषधे, वीजेचा पुरवठा करणे गरजेचे आहे़ शिवाय शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावाबाबत असलेले निकष बदलणे गरजेचे असून, जिल्ह्यातील नामंजूर झालेले ७६ प्रस्ताव मंजूर व्हावेत, मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत़ शिवाय राज्यात सर्वत्र हा निकष लागू व्हावा, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत़ वेळोवेळी आरक्षणाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर कोणी ना कोणी न्यायालयात गेल्याने तो प्रस्ताव बारगळला आहे़ हे शासन आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आरक्षण मिळावे यासाठी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू आहे़ या सर्वेक्षणाचा अहवाल आपण राज्य-केंद्राकडे सादर करणार असून, कोणीही या अहवालाला आव्हान दिले तर तो अहवाल टिकेल, असाच बनविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़ यावेळी बाळासाहेब पाटील-हाडोंग्रीकर, आश्रुबा कोळेकर, शिवाजी कोळेकर, आण्णा बंडगर आदीची उपस्थिती होती़ दरम्यान, महादेव जानकर यांनी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे जावून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़ पालिका, जिल्हा परिषद स्वबळावरमित्रपक्षांनी मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते़ त्यामुळे मी मंत्रीपद मागणे उचित नाही़ मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळणे गरजेचे आहे़ दिलेला शब्द पाळला नाही तर पुढील निवडणुकांमध्ये त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील़ शिवाय आगामी नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका रासपा स्वबळावर लढणार असल्याचेही जानकर यांनी यावेळी सांगितले़