शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

वाहनधारकांना जीवासाठी दहा मिनिटेही थांबणे होईना !

By admin | Updated: December 24, 2016 00:54 IST

लातूर : रस्ता असो की रेल्वे मार्ग अनेक ठिकाणी अतिघाई करणे धोकादायक असल्याचे सांगणारे फलक असतानाही अनेकजण याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करतात

लातूर : रस्ता असो की रेल्वे मार्ग अनेक ठिकाणी अतिघाई करणे धोकादायक असल्याचे सांगणारे फलक असतानाही अनेकजण याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करतात आणि अपघाताला बळी पडतात. रेल्वे येत असल्याने फाटक बंद करण्यात आले असतानाही शुक्रवारी सकाळी ११़३७ वाजण्याच्या सुमारास हरंगुळच्या रेल्वेफाटकावर जीव मुठीत घेऊन काही दुचाकी व चारचाकी वाहनधारकही घाई करीत असल्याचे आढळून आले़ दोन वाहनधारकांनी गेटच्या खालून दुचाकी घालून पळ काढला़ दहा मिनिटांसाठीही वाहनधारक थांबायला तयार नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघड झाले़ लातुरात रेल्वेचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे़ मुंबई, पुणे, निजामाबाद, हैदराबाद, कोल्हापूर आदी ठिकाणी रेल्वे जातात़ याशिवाय मालवाहतूक करणारी रेल्वेही आहे़ लातूर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गावर उड्डाणपूल असल्याने फाटकाचा फारसा संबंध येत नाही़ अंबाजोगाई रोड, बार्शी रोडवर पूल असून अन्य ठिकाणी फाटक आहेत़ रेल्वेस्थानकापासून हरंगुळ गाव, हरंगुळ स्टेशनजवळ अतिरिक्त एमआयडीसी, बारा नंबर पाटी याठिकाणी फाटक बसविण्यात आले आहे़ रेल्वे येणाऱ्या १० मिनिटे अगोदरच फाटक लावण्यात येते़ मात्र, दहा मिनिटेही थांबायला वाहनधारक तयार नसतात़ शुक्रवारी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटाला हरंगुळ स्टेशननजीकचे फाटक बंद करण्यात आले़ फाटक बंद होत असतानाच एका चारचाकी वाहनधारकाने कर्मचाऱ्यास फाटक बंद करू नको, एक मिनिटात जातो, असे म्हणत अर्धवट फाटकातून मार्ग काढला़ काही वाहनधारक जागेवरच होते़ तेवढ्यात पाठीमागून आलेला एक दुचाकी चालकही थांबायला तयार नव्हता़ त्यानेही फाटकाच्या खालून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला़ बरोबर ११ वाजून ४५ मिनिटाला रेल्वे येथून निघून गेली़ रेल्वे जायच्या अगोदर दोघांनी फाटकाच्या खालून वाहने काढून जीव धोक्यात घातला़ दरम्यान, कळंब रोडवरील रेल्वे फाटकाच्या बाजूने दुचाकी काढताना अनेकजण आढळून आले. फाटका खालून न काढता गेटच्या बाजूने जाऊन दुचाकी नेण्याचे प्रकार नेहमीच होतात. (प्रतिनिधी)