शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवत नाही तोपर्यंत राज्य सरकारने कोणतीही नोकरभरती करू नये, अशी एकमुखी ...

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवत नाही तोपर्यंत राज्य सरकारने कोणतीही नोकरभरती करू नये, अशी एकमुखी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित एल्गार परिषदेत शनिवारी येथे करण्यात आली.

मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे शनिवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एल्गार परिषद घेण्यात आली. परिषदेच्या सुरुवातीला शाहीर सुरेश जाधव यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. यावेळी परिषदेचे संयोजक रमेश केरे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने ५४ मूकमोर्चे काढून एसईबीसी आरक्षण मिळविले. मात्र, या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. यानंतर उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठा उमेदवारांच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना हे समाजाला न्याय देऊ शकत नाही. यामुळे त्यांना पदावरून हटवून जाणकार व्यक्तीला आरक्षण समितीचे अध्यक्ष करा, अशी मागणी करण्यात आली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटीचा निधी द्यावा. कोपर्डीच्या निर्भयाला न्याय देण्यासाठी तातडीने आरोपींना फासावर लटकविण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा तरुण स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एल्गार परिषद घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी शैलेश भिसे, डाॅ. वनारसे, किरण काळे पाटील, मनोज मुरदारे, शुभम केरे, तेजस पवार, भरत कदम, पंढरीनाथ गोडसे, अप्पासाहेब जाधव, मोतीभाऊ वाघ यांच्यासह सुमारे ३०० युवक व युवती उपस्थित होते.

==========

चौकट

...तर २८ रोजी क्रांती चौकात ठिय्या

२५ जानेवारी रोजी मराठा आरक्षणावरील स्थगिती न उठल्यास २८ जानेवारीपासून क्रांती चौकात ठिय्या देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध दर्शविणाऱ्या मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.