शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

अंगणवाडी सेविकांना नियुक्ती देऊ नका

By admin | Updated: September 2, 2014 01:55 IST

औरंगाबाद : एकात्मिक बालविकास सेवेची पुनर्रचना आणि बळकटीकरण करण्यासाठी राज्यातील २० जिल्ह्यांतील प्रत्येक अंगणवाडीसाठी थेट भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या

औरंगाबाद : एकात्मिक बालविकास सेवेची पुनर्रचना आणि बळकटीकरण करण्यासाठी राज्यातील २० जिल्ह्यांतील प्रत्येक अंगणवाडीसाठी थेट भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या अतिरिक्त अंगणवाडी सेवकांना नियुक्ती देऊ नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी दिले. ५ आॅगस्ट २०१० च्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागा अंगणवाडी मदतनिसांमधूनच भरण्यात याव्यात. त्यानंतर जागा रिक्त असल्यास पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून भरती प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश या निर्णयात आहेत. खात्यांतर्गत मदतनिसांमधून भरती करताना वयोमर्यादा नाही; मात्र थेट भरती प्रक्रियेकरिता २५ ते ३५ वयाची अट आहे. दरम्यान १२ आॅगस्ट २०१४ रोजी पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तांनी राज्यातील २० जिल्हा परिषदांना पत्र पाठवून एकात्मिक बालविकास सेवेची पुनर्रचना आणि बळकटीकरण करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीसाठी अतिरिक्त अंगणवाडी सेविकेची नेमणूक करण्याचे कळविले. निवड झालेल्या अंगणवाडी सेविकांना एकत्रित मानधन देण्यात येईल. त्यानुसार १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत याविषयीची माहिती देणे, तसेच सात दिवसांत अर्ज मागवून निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे कळविले. ही निवड प्रक्रिया बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी राबविण्याचे निर्देश देण्यात आले.