शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

दिवाळी संपली अतिक्रमणे हटवा!

By admin | Updated: November 3, 2016 01:35 IST

औरंगाबाद : शहरात ठिकठिकाणी मनपाला अतिक्रमण हटाव मोहीम राबवायची आहे. शासन आदेशानुसार पावसाळ्यात अतिक्रमणे काढता येत नाही.

औरंगाबाद : शहरात ठिकठिकाणी मनपाला अतिक्रमण हटाव मोहीम राबवायची आहे. शासन आदेशानुसार पावसाळ्यात अतिक्रमणे काढता येत नाही. त्यानंतर दिवाळीच्या तोंडावर कारवाई कशाला अशी एक ना अनेक कारणे मनपा अधिकाऱ्यांकडून देण्यात येत होती. आता दिवाळी पूर्णपणे संपलेली असून, युद्धपातळीवर अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू करा, असे आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रशासकीय विभागाला दिले.भूमिगत गटार योजनेचे ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणांचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर अतिक्रमणांमुळे मनपा प्रशासनाला ड्रेनेजलाईनचा मार्ग बदलावा लागला. १२ ठिकाणी भूमिगत गटार योजनेचे काम थांबले आहे. रस्ते रुंद करण्याची कारवाईसुद्धा मनपाला करायची आहे. प्रत्येक वेळी अधिकारी विविध कारणे सांगत होते. बुधवारी सकाळी आयुक्त बकोरिया यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दिवाळी संपलेली असून, शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी, असे आदेश दिले. यापुढे कोणतेही कारण आपण खपवून घेणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. आयुक्तांच्या आदेशामुळे अतिक्रमण हटाव विभाग शहरात कुठे कुठे कारवाई करायची आहे, याची यादीच तयार करीत आहे. गोमटेश मार्केट येथील औषधी भवनचा मुद्दा मागील सहा महिन्यांपासून गाजत आहे. औरंगाबाद केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनला नाला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे.४मनपाने यापूर्वी औषधी भवनला रीतसर नोटीसही बजावली आहे. राजकीय दबावामुळे ही कारवाई थांबविण्यात आली होती. ४पावसाळ्यात औषधी भवन खालून पाणी वाहून जात नाही. औषधी भवनवर लवकरात लवकर कारवाई करा, असे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले.डेब्रिज रस्त्यावर नकोमहापालिकेचे कंत्राटदार शहरात विविध भागात विकासकामे करतात. काम झाल्यानंतर डेब्रिज तेथेच ठेवून देण्यात येते. यापुढे प्रत्येक कामावर स्वत: कार्यकारी अभियंत्याने जाऊन पाहणी करावी. कंत्राटदाराने डेब्रिज उचलले किंवा नाही, असे लेखी प्रमाणपत्रच कंत्राटदाराला द्यावे. जोपर्यंत कार्यकारी अभियंता प्रमाणपत्र देणार नाही, तोपर्यंत कंत्राटदाराचे बिलच काढण्यात येऊ नये असे आदेश बुधवारी बैठकीत आयुक्तांनी लेखा विभागाचे मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांना दिले.