शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

भारनियमनमुक्तीची दिवाळी भेट

By admin | Updated: November 8, 2015 23:39 IST

बीड : परळीतील संच बंद पडल्याने जिल्ह्यात अनियमित वेळी भारनियमन होत आहे. ऐन दिवाळी सणात भारनियमन होऊ नये

बीड : परळीतील संच बंद पडल्याने जिल्ह्यात अनियमित वेळी भारनियमन होत आहे. ऐन दिवाळी सणात भारनियमन होऊ नये याकरिता महावितरणने जिल्ह्यातील कृषीपंपधारक ग्राहकांचे भारनियमन वाढवले आहे तर घरगुती ग्राहकांची ऐन सणात गैरसोय होऊ नये म्हणून ९ ते १३ नोव्हेंबरपर्यंत भारनियमनमुक्त केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील ४०० केव्ही उपकेंद्रावर बीड जिल्ह्यासह इतर चार जिल्ह्यांचा भार पडत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून भारनियमनात वाढ होत आहे. मुख्य कार्यालयाकडून ९ ते १३ नोव्हेंबरपर्यंत विभाग भारनियमनमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील परिस्थिती नाजूक असल्याने भारनियमनाची नामुष्की विभागावर ओढावली आहे. यावर पर्याय काढत विभागीय कार्यालयाने जिल्ह्यातील कृषीपंपधारकांचे भारनियमन वाढवले आहे. यापूर्वी शेतीपंपावरील फीडरला दिवसातून ८ तास विद्युत पुरवठा केला जात होता. रविवारपासून केवळ सहा तास पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. फीडरच्या संख्येनुसार काही भागात सकाळी ६ ते दुपारी १२, काही ठिकाणी दुपारी १२ ते ६ तर काही फीडरवर सायंकाळी ६ ते रात्री १२ असा वीजपुरवठा करण्यात आला. कृषीपंपधारकांच्या ८ तासांच्या विद्युत पुरवठ्यात दोन तासांची कपात करून विभागातील घरगुती ग्राहकांकडे वळविण्यात आला आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना अतिरिक्त भारनियमनापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)