शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

विभागीय आयुक्त भापकर झाले ‘काम अ‍ॅण्ड कूल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:12 IST

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर हे मात्र गेल्या काही दिवसांपासून बदललेले दिसत आहेत. त्यांच्या देहबोलीत बदल झाला आहे. नम्रपणे ते सर्वांचे ऐकून घेत आहेत

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘सिंघम स्टाइल’ काम करणारे म्हणून ते परिचित आहेत. अधिका-यांना आपल्या देहबोलीतूनच त्याची जागा दाखविणारे म्हणूनही त्यांची ख्याती आहे. प्रसंगी कठोर शब्द वापरून सहका-यांचा पानउतारादेखील ते करतात. बेधडक बोलणे आणि त्याच्या परिणामाची पर्वा न करणे असेदेखील त्यांचे वैैशिष्ट्य आहे. अशी अंगभूत वैशिष्ट्ये असलेले विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर हे मात्र गेल्या काही दिवसांपासून बदललेले दिसत आहेत. त्यांच्या देहबोलीत बदल झाला आहे. नम्रपणे ते सर्वांचे ऐकून घेत आहेत. सहका-यांशी आणि भेटायला आलेल्या शिष्टमंडळाशी ते उत्तम संवाद साधत आहेत. ते ‘काम अ‍ॅण्ड कूल’ झाल्याचे विभागीय आयुक्तालयातील अधिकारी सांगत आहेत. त्यांच्यामधील या बदलाने आश्चर्य करण्याबरोबरच सर्वांच्या चेह-यावर प्रश्नचिन्हही दिसत आहे.डॉ. भापकर यांच्या देहबोलीतील बदलाचे, वारंवार घेण्यात येत असलेल्या बैठकांमागचे रहस्य काय, याचे कोडे अनेकांना पडले आहे. मध्यंतरी डॉ. भापकर हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा समोर आली. या चर्चेत काही तथ्य आहे का, याचाही अंदाज अनेकजण त्यांच्या देहबोलीवरून लावत आहेत.जानेवारी २०१७ मध्ये विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महापालिकेतील कारभाराप्रमाणेच ते धडाक्यात सिंघम स्टाइलने मराठवाडा पातळीवर काम करतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांच्या कार्यशैलीत अचानक एवढा बदल झाला आहे की, ते आता फक्त बैठकांवर बैठका घेत आहेत. ११ महिन्यांपासून प्रशासकीय आढावा घेण्यातच गुंतलेले डॉ. भापकर यांना खरेच लोकसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहेत आणि ते त्यादृष्टीने काम करीत आहेत का, असा सवाल अनेकांच्या मनात घोळ घालत आहे.डॉ. भापकर यांच्या मनपातील सुमारे चार वर्षांच्या कार्यकाळात सुरुवातीची दोन वर्षे शांततेत गेली. परंतु २०१२ साली जानेवारी महिन्यात त्यांच्यावर सभागृहात सदस्यांनी निष्क्रियतेचा आरोप केल्यानंतर त्यांनी औरंगाबाद शहरातील अतिक्रमणांवर ‘न भूतो न भविष्यती’ असा हातोडा चालवून रस्त्यांचा अतिक्रमणाने कोंडलेला श्वास मोकळा केला. गुलमंडी, कैलासनगर, सिल्लेखाना, एकनाथनगर, शहागंज या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून त्यांचे रुंदीकरण त्यांच्या कार्यकाळात झाले. नागरिक आणि माध्यमांनी त्यांना सिंघम अशी उपाधीही बहाल केली. पालिका प्रशासनातील अधिका-यांना सतत शिवराळ भाषेत बोलण्यावरून ते नेहमीच चर्चेत राहिले. त्यांच्या मनपाच्या कार्यकाळात बदल्या आणि निलंबनाने शतकोत्सव साजरा केला होता. अशा स्टाइलने काम करणारे डॉ.भापकर विभागीय आयुक्त म्हणून काम करताना अतिशय मितभाषी आणि शांत झाले आहेत. त्यांची देहबोली अचानक बदलली आहे.बैठकींच्या सत्रांमुळे प्रशासनातील अधिकाºयांवर कामाचा ताण वाढला आहे. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर खुलताबाद येथील कर्मचा-याचा अचानक मृत्यू झाला होता. त्या कर्मचाºयाच्या मृत्यूला जबाबदार असणाºया अधिका-यांप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीचे काहीही झाले नाही. शहरालगतच्या अनधिकृत ११ खदानींप्रकरणी त्यांच्याकडे तक्रारी गेल्या, त्याबाबत काहीही निर्णय झाला नाही. इनामी जमिनी प्रकरण विक्री प्रकरणात तेवढी चौकशी मात्र त्यांनी करून घेतली. कार्यशाळा घेऊन सीताफळ महोत्सवाची तहान भागविण्यात आली. औरंगाबाद महानगर विकास प्राधिकरणाबाबतही त्यांनी बैठक घेतली. जनजागृतीवरही ते बैठकांमध्ये भर देत आहेत. त्यांच्या तोंडी ‘विकासा’ची भाषा आली आहे. त्यांच्या या नव्या कार्यशैलीमुळे त्यांच्या भविष्यातील कृतीविषयी अनेकजण अंदाज लावू लागले आहेत.