शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वाहतूक शाखेचे विभाजन

By admin | Updated: August 12, 2015 00:57 IST

जालना : शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतूक शाखेचा तीन उपविभागांत विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून,

जालना : शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतूक शाखेचा तीन उपविभागांत विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र अगोदरच वाहतूक शाखेत मान्यतेच्या ५० टक्केच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात विभाजन करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची वानवा निर्माण होणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.जालना शहरासह जिल्ह्यातील तालुकास्थानी असलेल्या शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. जालना शहरात तर दररोज वाहतुकीचा प्रश्न भेडसावत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी मागील आठवड्यात वाहतूक शाखेचा तीन विभागांत विभाजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार जालना, परतूर, अंबड-भोकरदन या उपविभागात विभाजन करण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक शेवगण यांच्यावर देण्यात आली. हे तिन्ही विभाग कार्यरत करण्यात आल्याने परतूर उपविभागासाठी पोलिस निरीक्षक शेवगण यांच्याकडे अतिरिक्त भार देण्यात आला. पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडे अंबड- भोकरदन उपविभागाचा पदभार देण्यात आला. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांच्याकडे परतूर व जालन्याचा पदभार देण्यात आला. यातील पोलीस निरीक्षक राऊत यांनी पदभार घेतला आहे. मात्र सपोनि पाटील यांनी अद्यापपर्यंत वाहतूक शाखेच्या उपविभागाचा पदभार घेतला नसल्याचे समजते. वाहतूक शाखेच्या तीनही उपविभागात त्या- त्या ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात येणार आहे. शिवाय पोलिस प्रशिक्षण झालेले ४७ कर्मचारी आहेत. ते सध्या नाशिक येथील कुंभमेळाव्यास बंदोबस्तासाठी आहे. ते तेथून परतल्यास त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्याही वाहतूक शाखेत करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेत पुरेसे मनुष्यबळ देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.जालन्यातील वाहतूक शाखेला ६० कर्मचारी संख्या मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात ३९ कर्मचारीच वाहतूक शाखेला देण्यात आले. त्यात पोालिस निरीक्षक दोन, उपनिरीक्षक ६, हे. कॉ. १०, नायक पो. कॉ १०, महिला कॉ ६ , पो.कॉ ५ या प्रमाणे मनुष्यबळ आहेत. शहरात वाहतुक शाखेचे बस स्थानक, वीर सावरकर चौक, पाणीवेस, जर्नादन मामा चौक, मुथा बिल्डींग, शनिमंदिर, अंबड चौफुली असे सुमारे ३० पॉइंट आहेत.