शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

महावितरणकडून धोकादायक तारांचे जाळे

By admin | Updated: August 11, 2014 00:04 IST

जालना : घरगुती वीज जोडणी करताना महावितरणने अनेक ठिकाणी नियमबाह्य जोडणी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जालना : घरगुती वीज जोडणी करताना महावितरणने अनेक ठिकाणी नियमबाह्य जोडणी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे जोडणीसाठीची संपूर्ण रक्कम घेऊन त्यासाठी खांबांऐवजी अक्षरश: लाकडी काड्यांचा उपयोग करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी विद्युत तारा रस्त्यावर लोंबकळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जिविताला हानी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून वीज कंत्राटदारांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. घरगुती वीज जोडणीसाठी १६०० ते २१०० रुपये आणि व्यावसायिक वीज जोडणीसाठी २६०० रुपये शुल्क आकारले जाणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात घरगुतीसाठी ३ ते ४५०० रुपये आणि व्यावसायिकसाठी ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. विशेष म्हणजे जोडणीसाठी वायर आणि केबल महावितरणकडूनच मिळणे आवश्यक आहे. मात्र ऐनवेळी लाईनमनमार्फत ‘सध्या आमच्याकडे केबल नाही, केबल बाहेरून आणावे लागेल. वायरही उपलब्ध नाही, वायर कमी आहे’ अशी कारणे सांगून त्यासाठीचे पैसे स्वतंत्र मागितले जातात. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे खाजगीकरणाद्वारे कंपनीत रूपांतर झाल्यानंतर जिल्हा पातळीवर वीज जोडणीच्या कामासाठीही टेंडर काढले जाते. ज्या एजन्सीला जोडणीचे काम दिले, त्या एजन्सीमार्फतच हे काम होण्याऐवजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फतच ही कामे केली जातात. त्यामुळे खांबांच्या वापराऐवजी चक्क लाकडी काड्यांचा वापर करण्यात येत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी झालेला आहे. जुना जालन्यातील योगेश्वरी कॉलनी भागात लोकांच्या जिविताला हानी होईल, अशाप्रकारे जोडणीसाठी वायर टाकण्यात आलेले आहेत. शास्त्री मोहल्ला भागात वायर आणि विद्युत ताराही लोंबकळत आहे. नूतन वसाहत, भाजीमंडई परिसर, संजयनगर, नीळकंठ कॉलनी, दु:खीनगर, देहेडकरवाडी परिसर, काद्राबाद परिसर, रामनगर, गांधीनगर, कन्हैय्यानगर, अलंकार परिसर, रेल्वेस्टेशन रोड परिसर, मंठा रोड परिसर इत्यादी भागात लोंबकळणारे वायर, विद्युत तारा आढळतात. हे सर्व प्रकार सुरू असताना महावितरणचे स्थानिक अधिकारी मात्र त्याकडे डोळेझाक करून कंत्राटदारांना पाठिशी घालण्याचा प्रकार करत असल्याने सर्वसामान्य लोकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे अशाप्रकारे नियमबाह्य कामे होत असताना दुसरीकडे सर्वसामान्य वीज ग्राहकांना नाहक त्रास देण्याचे प्रकारही होत आहेत. वीज दुरूस्तीसंबंधीचे अनेक अर्ज महावितरणकडे दाखल झालेले आहेत. मात्र त्यामध्ये मोजक्या ग्राहकांकडेच दुरूस्ती झालेली आहे. अनेक अर्ज अद्यापही पडून असल्याचे समजते.ग्राहकांनी याबाबत विचारणा केल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखविण्याचा नवा फंडाच सुरू झालेला आहे. (प्रतिनिधी)